गेल्या आठवड्यात सोने-चांदीच्या दरांमध्ये अचानक वाढ झाली आणि दोन दिवसानंतरच ते कमी देखील झाले. त्यामुळे सराफा व्यापारी व ग्राहक देखील गोंधळात पडले आहेत. सध्या सोन्याचा भाव 1,59,255 तोळा असा आहे, तर चांदी 2,80,000 दरम्यान आहे. सोने-चांदीच्या दरांमध्ये होत असलेल्या चढ-उतारा मागची कारणे काय आहेत? याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी माहिती दिलीये.
advertisement
MHADA Home : प्रथम येणाऱ्यास प्राधान्य! लॉटरी शिवाय घर घेण्याची संधी; कधी अन् कुठे अर्ज करायचा?
सोने-चांदी दरांमध्ये चढउताराचं कारण काय?
अमेरिका-इराणच्या टेरिफ धोरणामुळे सोने-चांदीच्या दरांमध्ये अराजकता निर्माण झाली आणि एकदम सोने-चांदीचे भाव वाढले व दोन दिवसातच पुन्हा ते भाव खाली आले. या सोने-चांदीच्या दरांमध्ये होत असलेल्या चढउतारा मागे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचे कारण आहे. चीनने चांदी निर्यात बंद केली. त्यामुळे चांदी उपलब्ध व्हायला कठीण जात आहे.
शुक्रवारी सोन्याचा भाव अचानकच 1,85,000 पर्यंत गेला आणि आता 1,60,000 पर्यंत आला आहे. तर चांदी 4,20,000 पर्यंत गेली होती चांदीचे भाव साधारणपणे 3 लाखांपर्यंत आले असल्याचे छत्रपती संभाजीनगर सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
यापूर्वी सोने-चांदीचे दर किती वाढायचे?
लग्नसराई असो किंवा इतर दिवसांमध्ये यापूर्वी 1000 ते 2000 पर्यंत दरांमध्ये वाढ होत होती, परंतु सध्याचा आंतरराष्ट्रीय मुद्दा असल्यामुळे हे भाव गगनाला जाऊन भिडले आहेत, व कमी देखील झाले त्यामुळे ग्राहक सोने-चांदी खरेदीला थांबले आहेत. जेव्हा भाव स्थिर होतील त्यावेळेला सोने-चांदीचा व्यापार सुरळीत होईल असे देखील मंडलिक यांनी म्हटले आहे.