TRENDING:

Piyush Goyal Exclusive Interview: जीएसटीमधील बदलानंतर महसूल कमी होणार नाही, उलट वाढेल- पीयूष गोयल यांचा विश्वास

Last Updated:

Piyush Goyal Exclusive Interview : केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी नेटवर्क 18शी भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक पैलूवर चर्चा केली. त्यांनी टॅरिफचा परिणाम आणि जीएसटीचा परिणाम यावरही चर्चा केली.

advertisement
News18
News18
advertisement

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी न्यूज18 चे ग्रुप एडिटर-इन-चीफ राहुल जोशी यांच्याशी संवाद साधताना भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. जीएसटीमधील बदलांनंतर सरकारच्या तिजोरीवर 48,000 कोटी रुपयांचा ताण पडणार, अशा चर्चांवरही त्यांनी भाष्य केले. गोयल म्हणाले की- सरकारला अपेक्षा आहे की महसूल कमी होणार नाही, उलट वाढेल.

advertisement

जीएसटी रॅशनलायझेशन हे भारतीय इतिहासातील मागील 56 वर्षांतील सर्वात मोठ्या बदलांपैकी एक आहे. कोणाला विश्वास बसेल का की केवळ 10 वर्षांत एखादं राष्ट्र इतकं सुंदररीत्या बदलू शकतं?, असे ते म्हणाले.

advertisement

घर बांधणे होणार स्वस्त

जेव्हा सिमेंटचे भाव कमी होतील तेव्हा लोकांसाठी घर घेणे स्वस्त आणि सुलभ होईल. ट्रॅक्टर, त्याचे पार्ट्स आणि इतर कृषी उपकरणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्याने त्यांची उत्पादकता वाढली आहे. उद्योगजगताने आश्वासन दिले आहे की याचा फायदा नक्कीच ग्राहकांपर्यंत पोहोचवला जाईल, असे गोयल म्हणाले.

advertisement

पंतप्रधानांना मिळाली तुटलेली अर्थव्यवस्था

गोयल यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेसकडून तुटलेली अर्थव्यवस्था वारशात मिळाली होती. त्यांनी वीट-वीट जोडत सुधारणा करून गरीबांपर्यंत जीवनगुणवत्तेचे फायदे पोहोचवले आणि सामाजिक सुरक्षेवर भर दिला. मागील चार वर्षांपासून भारत हा सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये राहिला आहे. अर्थव्यवस्थेला शहाणपणाने सांभाळण्याचे श्रेय मोदींनाच जाते, असे गोयल यांनी म्हटले.

advertisement

पंतप्रधानांचा दूरदृष्टीचा विजन

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आत्मनिर्भर भारत आणि डिजिटल भारताचे विजन हे काळाच्या पुढे आहे. त्यांच्या मते, ईज ऑफ डुइंग बिझनेस ही विकसित अर्थव्यवस्थेकडे जाण्याची वाट आहे. तुटलेल्या अर्थव्यवस्थेला सुधारून भारताला जगातील टॉप 5 अर्थव्यवस्थांमध्ये आणण्याचा हा 11 वर्षांचा प्रवास आहे आणि 2027 पर्यंत भारत टॉप 3 मध्ये पोहोचेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

गोयल म्हणाले, मी पंतप्रधान मोदींचे जीएसटीमधील बदलासाठी अभिनंदन करतो. हे मागील 56 वर्षांत देशाने पाहिलेले सर्वात मोठे परिवर्तनकारी पाऊल आहे.

गुंतवणूक वाढणार

कमी कर आणि कमी भावामुळे मागणी वाढेल. ज्यामुळे अधिक गुंतवणुकीला चालना मिळेल. मागणी वाढल्याने भारतात अधिक उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) होईल. हा विकासाचा सकारात्मक चक्र असेल ज्याला मल्टिप्लायर इफेक्टमुळे अधिक वेग मिळेल. दर महिन्याला सुमारे 2 लाख कोटी रुपयांची वसुली होत आहे आणि महसूल मजबूत होण्याची अपेक्षा आहे.

बाजाराचा विश्वास

बाजाराला विश्वास आहे की अर्थव्यवस्था सुरक्षित हातात आहे. अलीकडे बाजार काहीसे नरम असले तरी ते मर्यादेतच राहिले आहेत. त्यांना विश्वास आहे की जीएसटी रॅशनलायझेशनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळेल. भारत उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहे, असे गोयल यांनी सांगितले. तसेच अमेरिका आणि भारताचे संबंध खूप महत्त्वाचे आहेत त्यांनी स्पष्ट केले.

अमेरिका-भारत संबंध

अमेरिका आणि भारताचे संबंध अतिशय महत्वाचे आहेत. आम्ही बराच काळ मित्र आणि सहकारी राहिलो आहोत. मध्ये काही चढ-उतार आले तरी सध्याची टॅरिफ परिस्थिती ही केवळ एक टप्पा आहे जो निघून जाईल, कारण दोन्ही देशांमध्ये वास्तवाबद्दल सखोल समज आहे. आत्मविश्वासाने भरलेले हे नाते पुढे अधिक मजबूत होईल, असे गोयल म्हणाले.

काही गैरसमज होऊ शकतात, काही वैयक्तिक मतेही येऊ शकतात, पण यामुळे भारत-अमेरिका भागीदारी किंवा आघाडीवर काही फरक पडत नाही. दोन्ही देशांची मैत्री कोणीही रोखू शकत नाही, असे ते म्हणाले.

गोयल म्हणाले की- आम्ही नेहमी संवाद आणि कूटनीतीवर विश्वास ठेवतो. संबंध कमकुवत करण्याऐवजी मजबूत करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही कधीही माध्यमांद्वारे एफटीएबद्दल बोलत नाही, ती चर्चा नेहमी बंद दरवाज्यांआड होते.

शेतकऱ्यांचे हित अग्रक्रमावर

कोणत्याही व्यापार करारात जर शेतकरी, मच्छीमार आणि एमएसएमई यांच्या राष्ट्रीय हिताला धक्का पोहोचवणारी अट असेल तर ती आपल्यासाठी अस्वीकार्य असेल. धार्मिक भावना, शेतकरी, मच्छीमार आणि एमएसएमई यांच्या हितांशी कधीही तडजोड केली जाणार नाही, असे गोयल यांनी स्पष्ट केले.

यूएईइतर देशांसोबत करार

यूएईसोबत कपडा आणि सागरी खाद्य क्षेत्राला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी काम सुरू आहे. 18-19 सप्टेंबरला यूएईच्या दौऱ्यावर एक व्यावसायिक प्रतिनिधी मंडळ नेले जाईल. ज्यामुळे भारतीय निर्यातदारांना नवीन बाजारपेठा शोधण्यात मदत होईल.

इतर देशांसोबत एफटीए जलदगतीने पुढे नेण्याचे काम सुरू आहे. 4-5 ऑक्टोबरपर्यंत कतारसोबतच्या कराराच्या अटी अंतिम केल्या जातील. गोयल यांनी सिंगापूरच्या पंतप्रधानांना भेटले, ज्यांनी अधिक चिकन आणि सागरी खाद्य खरेदीचे आश्वासन दिले आहे. सिंगापूरला भारतीय सीफूड खूप आवडतो. याशिवाय लॅटिन अमेरिकेलाही भारतीय निर्यातदारांसाठी मोठे संधीस्थान मानले जात आहे.

रेसिप्रोकल टॅरिफ

रेसिप्रोकल टॅरिफ सर्व क्षेत्रांमध्ये लागू होत नाहीत. नवे करार होत आहेत आणि नवे बाजार खुले होत आहेत. टॅरिफ इतर देशांवर लागू होऊ शकतात आणि त्यांच्यासोबत काम करण्याच्या संधी आहेत. अमेरिकेचा आपल्या निर्यातीत फारच छोटा वाटा आहे. पर्यटन क्षेत्रही चांगल्या स्थितीत आहे आणि यंदा निर्यात मागील वर्षापेक्षा जास्त होईल, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.

देशांतर्गत अर्थव्यवस्था

भारत प्रामुख्याने एक देशांतर्गत अर्थव्यवस्था आहे. आपल्या निर्याती तुलनेने लहान आहेत, तर आयात जास्त आहेत. आयात भारतीय जीडीपीवर ताण आणतात. पण त्याचा फार मोठा परिणाम जीडीपीवर होईल; असे मला वाटत नाही, असे गोयल यांनी सांगितले.

महात्मा गांधींच्या विचारांचा विस्तार

गोयल म्हणाले की पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधींच्या विचारांना पुढे नेत प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात शौचालये उभी केली. लाल बहादुर शास्त्रीनंतर खादी आणि स्वदेशीला प्रोत्साहन देणारे जर कोणी असतील तर ते पंतप्रधान मोदी आहेत. चला आपण सर्वांनी स्वदेशी स्वीकारूया, असे आवाहन गोयल यांनी केले.

चीनसोबत सुलह

चीनसोबतचे मतभेद आम्ही सोडवले आहेत आणि नातेसंबंध परत गलवानपूर्व पातळीवर आणणे हे स्वाभाविकच होते. भारत प्रत्येक देशासोबत चांगले संबंध ठेवण्यावर विश्वास ठेवतो. मी सर्वांना आवाहन करतो की एखाद्या देशासोबतच्या संबंधाकडे दुसऱ्या देशाच्या नजरेतून पाहू नका. भारताचे प्रत्येक देशासोबतचे नाते वेगळे आणि स्वतंत्र आहे, असे गोयल म्हणाले.

मराठी बातम्या/मनी/
Piyush Goyal Exclusive Interview: जीएसटीमधील बदलानंतर महसूल कमी होणार नाही, उलट वाढेल- पीयूष गोयल यांचा विश्वास
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल