चव्हाण हे शेतकरी कुटुंबातील. काही वर्षांपूर्वी ते शेती करायचे, वेळोवेळी निसर्गाने साथ न दिल्यामुळे त्यांचा मोसंबीचा असलेला फळबाग काढावा लागला. त्या काळात शेती विकावी लागली आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे येऊन ते स्थायिक झाले आणि जालना रोडवरील चिकलठाणा येथील मिनी घाटी परिसरात छोट्या पिकअप गाडीतून चहा नाश्ता सेंटर सुरू केले.
advertisement
Success Story: आधी कामगार म्हणून केलं काम, आता तरुण चालवतो सोलापुरात हॉटेल, वर्षाला लाखात कमाई
नाश्ता सेंटर सुरू करण्यासाठी शेतीतील सर्व अवजारे त्यांना विकावी लागली त्यामध्ये दोन बैलांचा तर इतर साहित्यांचा देखील समावेश आहे. या अवजारांच्या विक्रीच्या पैशातून त्यांनी नाश्ता सेंटरचा व्यवसाय सुरू केला असून या व्यवसायातून त्यांचा उदरनिर्वाह चालतो.
नाश्ता सेंटरच्या व्यवसायाबरोबरच ते वेट लॉस जर्नी येथे देखील काम करतात. ज्यांचे वजन वाढले असेल त्यांना योग्य सल्ला देणे तसेच आहाराबद्दल मार्गदर्शन करणे यातून ते 15 ते 20 हजार रुपयांची कमाई करतात असे एकूण जवळपास 50 हजार रुपयांची महिन्याला ते कमाई करत आहेत. तसेच चव्हाण तरुणांना सांगतात की नोकरी प्रत्येकाला मिळेल असे शक्य नाही त्यामुळे तरुणांनी व्यवसायात यावे मात्र तरुणांना व्यवसाय कमी वाटतो. मात्र व्यवसाय कमी प्रगती करणारा आहे.