कशी केली व्यवसायाला सुरुवात?
संजीवनी जाधव या जालना शहरात एक सामान्य गृहिणी म्हणून राहत होत्या. परंतु आपणही काहीतरी करावे, कमाईचा मार्ग निर्माण करावा म्हणून त्यांनी कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी येथे आवळा प्रक्रिया उद्योग यावरील प्रशिक्षण घेतले. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर 2009 मध्ये त्यांनी 10 महिलांना सोबत घेऊन बचत गट सुरू केला.
advertisement
IT मध्ये नोकरी, दिव्याने सुरू केला पार्ट-टाईम दागिन्यांचा व्यवसाय, वर्षाला लाखांत कमाई
कोणकोणते बनवतात पदार्थ?
त्यानंतर त्यांनी आवळ्यापासून वेगवेगळे पदार्थ तयार केले. यामध्ये आवळ्यापासून लोणचे, आवळा कॅन्डी, आवळा सुपारी, आवळा पावडर इत्यादी पदार्थांचा समावेश होतो. या पदार्थांची निर्मिती यशस्वी झाल्यानंतर त्यांनी एमआयडीसी, जालना येथे मोठ्या स्तरावर लेबलिंग करून हा उद्योग वाढवला.
किती होतो नफा?
या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना वार्षिक 25 ते 30 लाखांची उलाढाल होऊन 12 ते 15 लाख रुपये निव्वळ नफा राहतो. संजीवनी जाधव हे पदार्थ विविध प्रदर्शनामध्ये विक्री करतात. त्यासोबतच त्या इतर महिलांनाही व्यवसायाचे मार्गदर्शन करतात.