या अपघातानंतर सुजय यांनी जवळपास दोन वर्षे डिप्रेशनचा सामना केला. परंतु हार न मानता त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली. शेवटी त्यांनी शेतीशी संबंधित पोशिंदा नावाने कंपनी सुरू केली आणि आज या कंपनीचा टर्नओव्हर तब्बल दोन कोटींवर पोहोचला आहे. त्याच्या या प्रवासाविषयी सुजय पाचंगे यांनी लोकल 18 ला दिली आहे.
स्वबळावर उभी केली दोन कोटींची कंपनी
advertisement
2022 साली सुजय पाचंगे यांनी पोशिंदा ही शेतीशी संबंधित कंपनी उभारली. पोशिंदा कंपनीत ऑर्गॅनिक वेस्टपासून सेंद्रिय खत तयार केलं जातं. त्यांनी बनवलेल्या या खतामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. त्यांच्या या पोशिंदा स्टार्टअपला अनेक अवॉर्डद्वारे सन्मानित करण्यात आलं आहे.
Success Story : फक्त 14 गुंठ्यात केली लागवड, 45 दिवसात मिळणार लाखात उत्पन्न, शेतकऱ्यानं करून दाखवलं!
व्हीलचेअरवर असूनही, सुजय यांनी जिद्दी आणि चिकाटीच्या जोरावर फक्त पोशिंदा नव्हे तर वरद ग्रुप ऑफ कंपनीसुद्धा उभी केली आहे. वरद कंपनीचा टर्नओव्हर तब्बल 20 कोटींपर्यंत पोहोचला असून, या दोन्ही स्टार्टअपमुळे सुजय यांनी हजारो हातांना रोजगार दिला आहे.