"जीएसटी सुधारणा ही ग्राहकांसाठी उत्पादनं आणि सेवा अधिक परवडणाऱ्या बनवण्यासाठी, व्यावसायिक गुंतागुंत कमी करण्यासाठी, महागाई नियंत्रित करण्यासाठी आणि किरकोळ क्षेत्रातील उपभोग वाढीला चालना देण्यासाठी एक प्रगतीशील पाऊल आहे. यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी विकास दर ७.८% पर्यंत पोहोचला आहे आणि या नवीन सुधारणा आर्थिक विकासाला दुहेरी अंकी (१०% च्या जवळ) नेऊ शकतात" अशी प्रतिक्रिया मुकेश अंबानी यांनी दिली.
advertisement
ईशा अंबानी काय म्हणाल्या?
रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या कार्यकारी संचालिका ईशा अंबानी यांनी जीएसटी सुधारणांना परिवर्तनकारक निर्णय असल्याचं म्हटलं आहे. "नवीन जीएसटी व्यवस्था घरगुती बजेटला दिलासा देईल आणि उद्योगासाठी अनुपालन सोपं करेल. हे ग्राहक आणि व्यवसाय दोघांसाठीही फायदेशीर आहे. रिलायन्स रिटेल पहिल्या दिवसापांसूनच त्यांच्या सर्व ग्राहकांना नवीन जीएसटी व्यवस्थांचे फायदे देण्यासाठी वचनबद्ध आहे' असं याावेळी ईशा अंबानी म्हणाल्या.
"या जीएसटी सुधारणांमधून व्यवसाय सुलभता वाढवण्याचा आणि ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्याचा सरकारचा स्पष्ट हेतू दिसून येतो. या सुधारणांचे पूर्ण फायदे ग्राहकांना पारदर्शक पद्धतीने आणि कोणत्याही विलंबाशिवाय मिळावेत याची खात्री करण्यासाठी रिलायन्स रिटेल पूर्णपणे वचनबद्ध आहे. आमचं वचन स्पष्ट आहे. जेव्हा जेव्हा खर्च कमी होईल तेव्हा आमच्या ग्राहकांना त्याचा लाभ मिळालाच पाहिजे. महागाई नियंत्रणात राहील जीएसटी सुसूत्रीकरण हा भारताच्या उपभोग प्रवासातील एक प्रमुख वळण आहे. यामुळे खर्च कमी होईल, महागाई नियंत्रित होईल आणि कार्यक्षमता वाढेल. याचा फायदा किरकोळ साखळीतील सर्व भागधारकांना होईल, ज्यात शेतकरी, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई), उत्पादक, पुरवठादार, किराणा दुकानदार आणि शेवटी ग्राहक यांचा समावेश आहे" असंही त्या म्हणाल्या.
तसंच, "रिलायन्स रिटेलला या परिवर्तनात आघाडीवर असल्याचा अभिमान आहे आणि भारताच्या १.४ अब्ज लोकांना सुधारणांचे पूर्ण फायदे पोहोचवण्यासाठी वचनबद्ध आहे. आम्ही अधिक समावेशक, स्पर्धात्मक आणि परवडणारी उपभोग अर्थव्यवस्था निर्माण करण्यास मदत करण्यास वचनबद्ध आहोत. भारतातील लोकांची क्रयशक्ती सतत वाढत आहे, ज्यामुळे ग्राहकांचा विश्वास मजबूत होत आहे. रिलायन्स रिटेल लाखो कुटुंबांना परवडणारी आणि सहज उपलब्ध असलेली दर्जेदार उत्पादने बनवण्यासाठी वचनबद्ध आहे" असंही यावेळी ईशा अंबानी म्हणाल्या.
रिलायन्स इंडस्ट्रीज कोणत्या क्षेत्रात काम करते?
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ही भारतातील सर्वात मोठी खाजगी कंपनी आहे. ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या वर्षात, तिचा एकूण महसूल १०,७१,१७४ कोटी रुपये (सुमारे $१२५.३ अब्ज) होता, रोख नफा १,४६,९१७ कोटी रुपये (सुमारे $१७.२ अब्ज) होता आणि निव्वळ नफा ८१,३०९ कोटी रुपये होता. रिलायन्स पेट्रोलियम एक्सप्लोरेशन आणि उत्पादन, पेट्रोलियम रिफायनिंग आणि मार्केटिंग, पेट्रोकेमिकल्स, प्रगत साहित्य आणि कंपोझिट्स, रिन्यूएबल (सौर आणि हायड्रोजन), रिटेल, डिजिटल सेवा, मीडिया आणि मनोरंजन अशा अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या यादीतही रिलायन्सचे स्थान महत्त्वाचे आहे.
२०२५ मध्ये, फॉर्च्यून ग्लोबल ५०० यादीत ती ८८ व्या क्रमांकावर होती, जी भारतातील कोणत्याही खाजगी कंपनीसाठी सर्वोच्च स्थान आहे. २०२४ मध्ये फोर्ब्स ग्लोबल २००० यादीत ती ४९ व्या क्रमांकावर होती, जी भारतीय कंपन्यांमध्ये सर्वोच्च होती. याशिवाय, रिलायन्स ही एकमेव भारतीय कंपनी आहे जिचे नाव टाईम मासिकाच्या २०२४ च्या १०० सर्वात प्रभावशाली कंपन्यांमध्ये दोनदा समाविष्ट झाले आहे.
रिलायन्स रिटेल काय करते?
रिलायन्स रिटेल लिमिटेड (RRL) ही रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) ची उपकंपनी आहे, जी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) समूहाच्या सर्व रिटेल कंपन्यांचे व्यवस्थापन करते. RRVL, तिच्या उपकंपन्या आणि सहयोगींद्वारे, किराणा, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि जीवनशैली आणि औषधे यांचा समावेश असलेले १९,५९२ स्टोअर्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचे विशाल नेटवर्क चालवते. रिलायन्स रिटेलचे ३५८ दशलक्षाहून अधिक नोंदणीकृत ग्राहक आहेत. ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या वर्षासाठी, RRVL ने एकूण ₹३,३०,८७० कोटींची उलाढाल आणि ₹२५,०५३ कोटींचा EBITDA (नफा) नोंदवला आहे.