12933 डाऊन आणि 12934 अप मुंबई सेंट्रल ते वटवा- अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल मार्गावर धावणारी कर्णवती एक्सप्रेस वांद्रा टर्मिनसवरून धावत आहे. ही ट्रेन 26 जानेवारी 2026 पासून मुंबई सेंट्रलच्या ऐवजी वांद्रा टर्मिनसपर्यंतच धावत आहे. ही एक्सप्रेस 27 एप्रिलपर्यंत वांद्रा टर्मिनसपर्यंत धावणार आहे. विशेष म्हणजे, रेल्वेने यापूर्वी 26 जानेवारी ते 7 मार्च या कालावधीसाठी हा बदल जाहीर केला होता. पण आता त्या कालावधीमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे. या बदलामुळे अनेक प्रवाशांची तारांबळ उडत आहे. त्यामुळे अनेक प्रवासी प्रवासापूर्वी आपल्या ट्रेनबद्दल माहिती घेत आहेत.
advertisement
गाडी क्रमांक 12933 दुपारी 01:55 वाजता वांद्रे टर्मिनसवरून सुटेल, तर गाडी क्रमांक 12934 दुपारी 12:30 वाजता वांद्रे टर्मिनसवर पोहोचेल. बोरिवली आणि वटवा/ अहमदाबाद दरम्यानच्या उर्वरित वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही. ही गाडी वांद्रे टर्मिनस, वापी, वलसाड, सुरत, भरूच जंक्शन, वडोदरा जंक्शन, आनंद जंक्शन, नडियाद जंक्शन आणि वटवा या १० स्थानकांवर थांबा आहे. अधिकाऱ्यांनी पुढे स्पष्ट केले की, इतरत्र स्थानकांवरील वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही. इतर सर्व कामकाज जशाच्या तसे कायम राहील.
