एक्सप्रेस वेवर झालेल्या वाहतूक कोंडीच्या काळामध्ये प्रवाशांकडून वसूल करून घेण्यात आलेला टोल वाहन मालकांना परत करण्याबाबत महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) सकारात्मक आहे. येत्या आठ दिवसांमध्ये या प्रकरणाची कार्यवाही पूर्ण करून टोल परत केला जाणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे कार्यकारी अधिकारी राकेश सोनावणे यांनी दिली आहे. दरम्यान, मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर 3 फेब्रुवारी रोजी 32 तास झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये वाहन चालक आणि प्रवाशांची गैरसोय झाल्यामुळे महाराष्ट्र शासनाने आणि एमएसआरडीसीने अडकलेल्या वाहनांना टोलवसुली करण्याची निर्णय घेतला आहे.
advertisement
अलीकडेच, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या पदाधिकार्यांची IRB कंपनीने प्रवाशांकडून टोल वसूली केल्याच्या निषेधार्थ MSRDC, IRB आणि वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांची खालापूर टोल नाका येथे बैठक पार पडली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या पदाधिकार्यांनी सर्व अधिकाऱ्यांना जाब विचारत कोंडीदरम्यान वसूल केलेला टोल प्रवाशांना परत करण्याची ठाम मागणी केली. यावेळी बैठकीमध्ये, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या पदाधिकार्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमोर सर्वच गैर सुविधांचा पाढा वाचून दाखवला. बैठकीमध्ये, संबंधित अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या मागण्या मान्य करत लवकरात लवकर कोंडीदरम्यान वसूल केलेले प्रवाशांच्या टोलचे पैसे त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जातील.
