धारावीतील कुटुंबात असं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण घटनाही धारावी कोळीवाडा येथे घडली आहे.जिथंच आरोपी अमृत आणि त्याची पत्नी सूरजबेन सोलंकी वास्तव्यास होती तर त्यांची चार मुले ती मुलुंड आणि ठाणे परिसरात राहतात.
या घटनेप्रकरणी आरोपीचा मुला शिवराम सोलंकीने दिलेल्या तक्रानुसार, गेल्या काही वर्षापासून आरोपी अमृत हे त्यांची पत्नी आणि मुलांवर करणी करण्याचा संशय घ्यायचे यावरुन या कुटुंबात वादही होत असायचे.
advertisement
व्हिडिओ कॉलवर समोर आला धक्कादायक प्रकार
13 मार्च म्हणजे घटनेच्या दिवशी आरोपी अमृतचा मुलगा हा त्यांना नातेवाइकांच्या अंत्यविधीसाठी बोलवण्यासाठी घरी गेला. पण नेमका तिकडे पोहचल्यावर घरचा दरवाजा बंद होता आणि आतूनही कोणता प्रतिसाद मिळत नव्हता.
त्यामुळे अमृतच्या मुलाने वडिलांना फोन केला पण मुलाचा फोन न उचलता त्यांनी उलट मुलाला व्हिडिओ कॉल केला,तेव्हा आरोपी अमृत रक्ताने माखलेला दिसून आला. घटना समोर आल्यानंर पत्नीची ओढणीने गळा आवळून आणि पाण्याची बाटली डोक्यात घालून हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली.
