उत्तन – विरार सागरी मार्ग हा प्रकल्पाच्या विरार कनेक्टरमार्फत वडोदरा – मुंबई एक्स्प्रेस वे सोबत जोडला जाणार आहे. त्यामुळे उपनगरांपासून पश्चिम किनारपट्टीपर्यंतचा मालवाहतूक व प्रवासी वाहतूक मार्ग अधिक जलद आणि कार्यक्षम होणार आहे. हा प्रकल्प भारताच्या बंदर आधारित विकास दृष्टिकोनाला महत्त्वाची साथ देणारा ठरेल, असं फडणवीस यांनी म्हटलंय. तसेच प्रस्तावित मंजुरीची प्रक्रिया वेगाने करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
advertisement
ST Fare: लालपरीचा प्रवास आजपासून स्वस्त, आता फुल तिकीट वाल्यांना सवलत, काय आहे नवी योजना?
कसा असेल प्रकल्प?
उत्तन – विरार प्रकल्प एकूण 55.12 किमी लांबीचा आहे. यामध्ये 24.35 किमीचा सागरी मार्ग असेल. तर 30.77 किमी कनेक्टर असेल.
मुंबईतून विरार 45 मिनिटांत
उत्तन - विरार सागरी सेतू प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची उभारणी एमएमआरडीए मार्फत करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईतून - विरारला फक्त 45 मिनिटांत जाता येईल. या महामार्गामुळं पश्चिम द्रुतगती महामार्ग, एस.व्ही. रोड आणि लिंक रोडसारख्या मार्गावरील ताण हलका होणार आहे. तसेच, वाहतूक कोंडीदेखील कमी होणार असून वायू आणि ध्वनी प्रदूषणदेखील कमी होईल.
