दिल्लीच्या निवडणुकीत आरएसएस भाजपसाठी वोट मागणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकतायत. ही गोष्ट खरी आहे का? असा सवाल केजरीवाल पत्राच्या सुरुवातीला मोहन भागवतांना विचारतात. पण तत्पुर्वी गेल्या काही दिवसात भाजपने ज्या चुकीच्या गोष्टी केल्या आहेत. भापजच्या या गोष्टींना आरएसएस समर्थन करते का? असा सवाल केजरीवला यांनी उपस्थित केला आहे.
त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी मोहन भागवत यांना प्रश्न विचारले आहेत. भाजपचे नेते खुलेआम पैसे वाटून मत विकत घेत आहेत त्या मत खरेदीला RSS समर्थन देत का ? RSS ला लोकशाहीसाठी हे योग्य वाटते का ? भाजपने भूतकाळात जे काही चुकीचे केले आहे, त्याला RSS पाठींबा देतो का ? तुम्हाला नाही वाटत भाजप अशाप्रकारे भारतीय लोकशाहीला कमजोर करतेय? असे सवाल करत RSSचा याला पाठिंबा आहे का? असा सवाल केजरीवालांनी मोहन भागवतांना केला आहे.
advertisement
खरे तर आरएसएसवर हल्ला करून अरविंद केजरीवाल यांना दिल्लीत भाजपविरोधी मतांचे विभाजन होऊ नये, असे वाटते. ते वारंवार आरएसएसला भाजपसोबत ओढण्याचा प्रयत्न करत आहेत जेणेकरून भाजपविरोधी मतदार जे काँग्रेसकडे जातील त्यांना समजावे की तेच भाजपचे खरे विरोधक आहेत. आरएसएस आणि भाजप यांच्यातील संबंधांवर केजरीवाल वारंवार प्रश्न उपस्थित करत आहेत.
भाजपचा लेटर वॉर
दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री खोटे असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.सचदेवा लिहितात की मला खात्री आहे की आता तुम्ही तुमच्या मुलांवर कधीही खोटी शपथ घेणार नाही. खरे तर राजकारणात येण्यापूर्वी अरविंद केजरीवाल आपल्या मुलांकडून शपथ घेत असत की आपण सत्तेत आलो तर काँग्रेसशी तडजोड करणार नाही. पण नंतर त्यांच्या पाठिंब्याने पहिल्यांदाच सरकार स्थापन झाले. दोन्ही पक्षांनी लोकसभा निवडणूक एकत्र लढवली.
सचदेवा यांना आणखी एक वचन द्यायचे आहे की अरविंद केजरीवाल यापुढे वृद्ध, महिला आणि धार्मिक लोकांच्या भावनांशी खेळणार नाहीत. साहजिकच, महिला, वृद्ध आणि पुजारी यांच्या नावांसाठी नोंदणी मोहीम राबवून सरकार स्थापन झाल्यास या घटकांसाठी कल्याणकारी कार्यक्रम सुरू केले जातील, असे वचन त्यांना देणे हा त्यांचा हेतू आहे.
महिलांना 2100 रुपये, वृद्धांसाठी मोफत उपचाराची व्यवस्था आणि पुजाऱ्यांना 18 हजार रुपये प्रति महिना देण्याचे आश्वासन दिले आहे. तर केजरीवाल हे सर्व कसे करू शकतील असे भाजपचे म्हणणे आहे. पंजाबमध्ये अद्याप महिला सन्मान निधी देण्यात आलेला नाही. दिल्लीतील मशिदीच्या मौलवींची थकीत रक्कम १८ महिन्यांपासून आजतागायत मिळालेली नाही,असे मुद्दे उपस्थित करून भाजपने केजरीवालावर पलटवार केला आहे.