फिनलंड आणि आइसलँड: शुद्धतेचा 100 % रेकॉर्ड
जगातील सर्वात सुरक्षित आणि शुद्ध पिण्याचे पाणी देणाऱ्या देशांच्या यादीत Finland आणि Iceland यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. या दोन्ही देशांनी 100 पैकी 100 गुण मिळवून जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळवला आहे. या देशांनी पाणी शुद्ध करण्याची अत्यंत प्रगत यंत्रणा उभारली आहे आणि पर्यावरणाचे कडक नियम पाळले आहेत. त्यानंतर युनायटेड किंगडम आणि स्वित्झर्लंड या देशांचा क्रमांक लागतो.
advertisement
आशियाई देशांमध्ये Singapore जलव्यवस्थापनात 'लिडर' म्हणून समोर आला आहे. नैसर्गिक संसाधने मर्यादित असूनही, सिंगापूरने वॉटर रिसायकलिंग आणि समुद्राचे खारे पाणी गोड करण्याच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे आपल्या नागरिकांना शुद्ध पाणी सुनिश्चित केले आहे. दुसरीकडे, Canada मध्ये जगातील ताज्या पाण्याचे सुमारे 20% साठे आहेत, त्यामुळे नैसर्गिकरित्या तिथे पाण्याची गुणवत्ता उत्तम आहे.
भारताची चिंताजनक स्थिती
शुद्ध पाण्याच्या जागतिक क्रमवारीत भारताची स्थिती मात्र विचार करायला लावणारी आहे. 2024 च्या एनवायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्सनुसार, जगातील 180 देशांच्या यादीत भारत 176 व्या क्रमांकावर आहे. पर्यावरणीय आरोग्याच्या बाबतीत भारत सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या देशांपैकी एक ठरला आहे.
भारताची क्रमवारी इतकी खाली असण्यामागे अनेक कारणे आहेत,
1. नद्यांमधील प्रदूषण: वाढत्या शहरीकरणामुळे नद्यांमध्ये सांडपाणी आणि कचरा मोठ्या प्रमाणात मिसळत आहे.
2. सांडपाणी प्रक्रियेचा अभाव: सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या यंत्रणा आजही अनेक शहरात अपुऱ्या आहेत.
3. असमान वाटप: आजही लाखो भारतीयांना त्यांच्या घराजवळ सुरक्षित पाणी मिळत नाही, त्यांना दूषित स्रोतांवर अवलंबून राहावे लागते.
जरी भारताची रँकिंग कमी असली, तरी जगातील सर्वात स्वच्छ नद्यांपैकी एक नदी भारतातच आहे. मेघालयातील डाउकी येथे असलेली Umngot नदी इतकी पारदर्शक आहे की, त्यातील नाव हवेत तरंगत असल्याचा भास होतो. हे सिद्ध करते की, जर आपण ठरवलं तर आपण आपली जलसंपदा जपून ठेवू शकतो.
थोडक्यात काय तर शुद्ध पाणी मिळणे हा प्रत्येक मानवाचा अधिकार आहे. फिनलंडसारख्या देशांकडून आपण तंत्रज्ञान आणि शिस्त शिकण्याची गरज आहे, तर उमनगोट नदीसारख्या वारशाचे जतन करण्याची जबाबदारी आपली आहे.
