TRENDING:

World Cleanest Water : 'या' देशांमध्ये मिळतं जगातील सर्वात शुद्ध पाणी, या यादीत भारताचा नंबर कितवा?

Last Updated:

जगात असेही काही देश आहेत, जिथे नळाचं पाणी कोणत्याही फिल्टरशिवाय थेट पिता येतं आणि ते जगातलं सर्वात शुद्ध पाणी मानलं जातं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला सर्वात जास्त कशाची गरज भासत असेल, तर ते म्हणजे पाणी. आपण म्हणतोच की पाणी हे जीवन आहे. पण, हे जीवन खरोखर किती शुद्ध आहे? आजच्या काळात शहरांमध्ये आपण वॉटर प्युरिफायर लावतो, बाहेर गेलो की बाटलीबंद पाणी विकत घेतो, कारण आपल्याला नळाच्या पाण्यावर विश्वास उरलेला नाही. पण जगात असेही काही देश आहेत, जिथे नळाचं पाणी कोणत्याही फिल्टरशिवाय थेट पिता येतं आणि ते जगातलं सर्वात शुद्ध पाणी मानलं जातं. दुसरीकडे, असेही काही देश आहेत जिथे आजही लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी अनेक किलोमीटर दूर पायपीट करावी लागते किंवा प्रदूषित पाण्यावर अवलंबून राहावे लागते. एनवायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्सच्या ताज्या अहवालाने जगातील पाण्याच्या गुणवत्तेचा आरसा आपल्यासमोर धरला आहे. चला तर मग, जाणून घेऊया शुद्ध पाण्याच्या बाबतीत जगात कोण अव्वल आहे आणि आपला भारत नक्की कुठे उभा आहे.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

फिनलंड आणि आइसलँड: शुद्धतेचा 100 % रेकॉर्ड

जगातील सर्वात सुरक्षित आणि शुद्ध पिण्याचे पाणी देणाऱ्या देशांच्या यादीत Finland आणि Iceland यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. या दोन्ही देशांनी 100 पैकी 100 गुण मिळवून जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळवला आहे. या देशांनी पाणी शुद्ध करण्याची अत्यंत प्रगत यंत्रणा उभारली आहे आणि पर्यावरणाचे कडक नियम पाळले आहेत. त्यानंतर युनायटेड किंगडम आणि स्वित्झर्लंड या देशांचा क्रमांक लागतो.

advertisement

आशियाई देशांमध्ये Singapore जलव्यवस्थापनात 'लिडर' म्हणून समोर आला आहे. नैसर्गिक संसाधने मर्यादित असूनही, सिंगापूरने वॉटर रिसायकलिंग आणि समुद्राचे खारे पाणी गोड करण्याच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे आपल्या नागरिकांना शुद्ध पाणी सुनिश्चित केले आहे. दुसरीकडे, Canada मध्ये जगातील ताज्या पाण्याचे सुमारे 20% साठे आहेत, त्यामुळे नैसर्गिकरित्या तिथे पाण्याची गुणवत्ता उत्तम आहे.

भारताची चिंताजनक स्थिती

advertisement

शुद्ध पाण्याच्या जागतिक क्रमवारीत भारताची स्थिती मात्र विचार करायला लावणारी आहे. 2024 च्या एनवायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्सनुसार, जगातील 180 देशांच्या यादीत भारत 176 व्या क्रमांकावर आहे. पर्यावरणीय आरोग्याच्या बाबतीत भारत सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या देशांपैकी एक ठरला आहे.

भारताची क्रमवारी इतकी खाली असण्यामागे अनेक कारणे आहेत,

1. नद्यांमधील प्रदूषण: वाढत्या शहरीकरणामुळे नद्यांमध्ये सांडपाणी आणि कचरा मोठ्या प्रमाणात मिसळत आहे.

advertisement

2. सांडपाणी प्रक्रियेचा अभाव: सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या यंत्रणा आजही अनेक शहरात अपुऱ्या आहेत.

3. असमान वाटप: आजही लाखो भारतीयांना त्यांच्या घराजवळ सुरक्षित पाणी मिळत नाही, त्यांना दूषित स्रोतांवर अवलंबून राहावे लागते.

जरी भारताची रँकिंग कमी असली, तरी जगातील सर्वात स्वच्छ नद्यांपैकी एक नदी भारतातच आहे. मेघालयातील डाउकी येथे असलेली Umngot नदी इतकी पारदर्शक आहे की, त्यातील नाव हवेत तरंगत असल्याचा भास होतो. हे सिद्ध करते की, जर आपण ठरवलं तर आपण आपली जलसंपदा जपून ठेवू शकतो.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याचे भाव पुन्हा कोसळले, लिंबू आणि केळीची काय स्थिती? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

थोडक्यात काय तर शुद्ध पाणी मिळणे हा प्रत्येक मानवाचा अधिकार आहे. फिनलंडसारख्या देशांकडून आपण तंत्रज्ञान आणि शिस्त शिकण्याची गरज आहे, तर उमनगोट नदीसारख्या वारशाचे जतन करण्याची जबाबदारी आपली आहे.

मराठी बातम्या/देश/
World Cleanest Water : 'या' देशांमध्ये मिळतं जगातील सर्वात शुद्ध पाणी, या यादीत भारताचा नंबर कितवा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल