माणिकपूर वळणावर नेहमीच गर्दी असते. वेगाने कानपूरच्या दिशेने जाणारा ट्रक अचानक अनियंत्रित झाला. रस्त्याकडेला असलेल्या दुकानांमध्ये हा ट्रक घुसला. यानंतर मोठा गोंधळ उडाला. गोंधळात लोक इकडे तिकडे जिवाच्या आकांताने धावत होते.
अपघाताची माहिती मिळताच एसएसपी संजय वर्मा, डीएम अवनीश राय, सीओ सिटी पोलीस फोर्ससह घटनास्थळी पोहोचले. महामार्गाकडेला असलेल्या चहा दुकानातील २६ वर्षीय कुलदीपसह आणखी दोघांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात घटनास्थळी चार जण अडकले होते. त्यांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. चौघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये एकाचे वय १५ वर्षे असून त्याचं नाव राहुल असल्याची माहिती समजते. तर दुसऱ्याचे नाव तालिब इकदिल असं आहे. घटनेनंतर चालक ट्रक सोडून फरार झाला आहे. पोलिसांनी या अपघाताची नोंद केली आहे. आता चालक आणि ट्रक मालकाचा शोध घेतला जात आहे.
