पैसा डबल करणारी सरकारी स्किम कोणती? रिस्कशिवाय मिळेल बंपर रिटर्न
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
तुम्हालाही तुमचे कष्टाने कमावलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित आणि कालांतराने दुप्पट करायचे असतील, तर एक सरकार स्किमविषयी आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
1/6

आजच्या काळात, जेव्हा शेअर बाजार अस्थिर आहे आणि बरेच लोक त्यांच्या गुंतवणुकीबद्दल अनिश्चित आहेत. तेव्हा प्रत्येक गुंतवणूकदार सुरक्षित आणि विश्वासार्ह ऑप्शन शोधत असतो. तुम्हाला तुमचे कष्टाने कमावलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित आणि निश्चित कालावधीत दुप्पट करायचे असतील, तर पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र (KVP) योजना तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन असू शकते. ही केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी योजना आहे, जी गुंतवणुकीवर 100% सरकारी हमी देते.
advertisement
2/6
किसान विकास पत्र ही पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जाणारी निश्चित उत्पन्न बचत योजना आहे. या योजनेचे सर्वात महत्त्वाचे फीचर म्हणजे त्यात गुंतवलेली रक्कम निश्चित कालावधीनंतर आपोआप दुप्पट होते. म्हणूनच ही योजना विशेषतः अशा लोकांमध्ये लोकप्रिय आहे जे जोखीम टाळतात आणि गॅरंटीड रिटर्न शोधतात.
advertisement
3/6
7.5% वार्षिक व्याजदर : सध्या, केव्हीपी 7.5 % वार्षिक चक्रवाढ व्याज देते. या व्याजदराने, गुंतवलेली रक्कम 115 महिन्यांत किंवा अंदाजे ९ वर्षे आणि 9 महिन्यांत दुप्पट होते. उदाहरणार्थ, एखाद्या गुंतवणूकदाराने किसान विकास पत्रात ₹1 लाख गुंतवले तर त्यांना निर्धारित कालावधी पूर्ण झाल्यावर ₹2 लाख मिळतील. शिवाय, लहान गुंतवणूकदार देखील सहजपणे सुरुवात करू शकतात.
advertisement
4/6
किसान विकास पत्रात किमान गुंतवणूक रक्कम ₹1000 आहे, तर कमाल गुंतवणूक मर्यादा नाही. गुंतवणूकदार सिंगल अकाउंट किंवा जॉइंट अकाउंटद्वारे गुंतवणूक करू शकतात. पालक त्यांच्या अल्पवयीन मुलाच्या नावाने केव्हीपी अकाउंट देखील उघडू शकतात, ज्यामुळे त्यांना भविष्यातील गरजांसाठी एक सुरक्षित निधी तयार करता येतो.
advertisement
5/6
स्कीमचे इतर फायदे : या योजनेचे इतर अनेक फायदे आहेत. KVPला 100% सरकारी हमी दिली जाते. ज्यामुळे गुंतवणुकीची संपूर्ण सुरक्षा सुनिश्चित होते. गरज पडल्यास केव्हीपी प्रमाणपत्रावर बँक कर्ज देखील मिळू शकते. शिवाय, अकाउंट एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर केले जाऊ शकते आणि नॉमिनेशन देखील उपलब्ध आहे.
advertisement
6/6
व्याज करपात्र आहे : किसान विकास पत्र ही दीर्घकालीन योजना असली तरी, काही अटींवर अडीच वर्षांनी अंशतः किंवा पूर्ण पैसे काढता येतात. गुंतवणूकदारांनी हे देखील लक्षात ठेवावे की केव्हीपीवर मिळणारे व्याज करपात्र आहे, म्हणजेच टॅक्स नियम लागू होतात.