शिक्षण MA, भारत-पाकिस्तान सीमेवर सुरू केला हा व्यवसाय, आज वर्षाला 1 कोटीपेक्षा जास्त उलाढाल
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
असे म्हणतात की, मंदिर, असेल घरात धार्मिक कार्यक्रम असेल किंवा पूजा विधी असेल यावेळी अगरबत्ती वापरली जाते. देशात उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून ते पश्चिमपर्यंत वर्षभर याची मागणी असते.
advertisement
1/4

या गोष्टीला लक्षात ठेवता 8 वर्षांपूर्वी भारत-पाकिस्तानच्या सीमेवर बाडमेर येथील एका व्यक्तीने अगरबत्तीचा एक छोटासा व्यवसाय सुरू केला होता. आज या व्यवसायाच्या माध्यमातून वर्षाला कोट्यवधींची उलाढाल होत आहे.
advertisement
2/4
येथील अगरबत्तींची आज फक्त बाडमेरच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यांसह गुजरातमध्येही मागणी आहे. मुकेश खत्री यांनी हा व्यवसाय सुरू केला होता. त्यांनी एमए पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी आठ वर्षांपूर्वी विजया दशमी यांची सुरुवात केली होती. आज वर्षाला कोट्यवधींची उलाढाल याठिकाणी होत आहे.
advertisement
3/4
मुकेश खत्री यांनी सांगितले की, राजस्थान व्यतिरिक्त गुजरातमध्येही त्यांचा हा व्यवसाय सुरू झाला आहे. बाहेरच्या राज्यातून रॉ स्टिक आणल्या जातात आणि नंतर इथे त्यांच्यावर प्रकिया केली जाते. यानंतर बॉक्समध्ये पॅक केल्या जातात.
advertisement
4/4
त्यांच्या ठिकाणी गुलाब, चंदन, मोगरा, चंपा, पायनॅपलच्या सुगंधाची अगरबत्ती तयार केली जाते. त्यांची वार्षिक उलाढाल 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या ठिकाणाहून दरवर्षी सुमारे 80 टन मालाची विक्री होते आणि येथे किमान 100 ते 4 हजार रुपयांपर्यंत अगरबत्ती विकली जाते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
शिक्षण MA, भारत-पाकिस्तान सीमेवर सुरू केला हा व्यवसाय, आज वर्षाला 1 कोटीपेक्षा जास्त उलाढाल