Weather Alert: कुठं उष्णतेची लाट, तर कुठं अवकाळी अलर्ट, महाराष्ट्रावर पुन्हा संकट
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात अंग भाजून काढणारा उन्हाळा जाणवत आहेत. अशातच नव्या संकटाचा अलर्ट देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात मार्चमध्येच सूर्याचा प्रकोप झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. कोकण ते व विदर्भ सर्वच भागात तापमानात मोठी वाढ झाली असून सरासरीपेक्षा पारा जास्त चढला आहे. राज्यात मुख्यत: उष्ण आणि कोरडे हवामान कायम आहे. तसेच मार्चमध्येच उष्णतेची लाट सुरू आहे. काही ठिकाणी ऑरेंज तर कुठे यलो अलर्ट जारी करण्यात येत आहे. आज, 11 मार्चचे हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
कोकणात सूर्याचा पारा चांगलाच चढला आहे. मंगळवारी मुंबईसह ठाणे, पालघर या जिल्ह्यांना ‘हिट वेव्ह’चा ऑरेंज अलर्ट होता. आज पुन्हा तापमान घामटा काढणार असून उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात काही ठिकाणी पारा चाळीशी पार जाण्याची शक्यता आहे. तर मुंबईत कमाल तापमान 36 अंशांपर्यंत जाईल. पावसाची शक्यता नाही.
advertisement
advertisement
advertisement
विदर्भात अक्षरश: भाजून काढणारे ऊन जाणवत आहे. नागपूरसह अमरावती, अकोला, वर्धा आणि इतर जिल्ह्यांत कमाल तापमान चाळीशी पार गेले आहे. आज काही भागात यलो अलर्ट असेल. हवामान कोरडे राहील. मात्र, 48 तासानंतर विदर्भावर पुन्हा मोठे संकट येत आहे. पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यांसह गडगडाटी पावसाची शक्यता असून यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
advertisement







