नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, २२ फेब्रुवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास जालिंदर भाडळे हे त्यांच्या शेतात काम करत होते. उसाची तोडणी पूर्ण झाल्याने शेत साफ करण्यासाठी त्यांनी पाचट जाळण्याचा निर्णय घेतला आणि आग लावली. मात्र, दुपारची वेळ असल्याने वाऱ्याचा वेग अचानक वाढला आणि काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केलं.
advertisement
आगीच्या ज्वाळांनी चारही बाजूंनी वेढलं
कोरडं पाचट असल्यानं आगीचा भडका उडाला. धुराचे लोट आणि धग इतकी प्रचंड होती की, भाडळे यांना सावरण्याची संधीच मिळाली नाही. आगीच्या ज्वाळांनी त्यांना चारही बाजूंनी घेरलं. धुरामुळं गुदमरून आणि गंभीररीत्या भाजल्यानं त्यांचा जागीच करुण अंत झाला. बराच वेळ झाला तरी भाडळे घरी न परतल्यानं कुटुंबीयांनी आणि शेजारच्या शेतकऱ्यांनी त्यांची शोधाशोध सुरू केली, तेव्हा ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
गंभीररीत्या भाजलेल्या भाडळे यांना तातडीने केडगाव येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. जालिंदर भाडळे यांच्या निधनाने पारगाव परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
