सायली सुर्वेने १० वर्षांपूर्वी मीरा-भाईंदरमधील उद्योजक आतिफ तासे याच्याशी विवाह केला होता. लग्नानंतर तिचे नाव 'अलीझा तासे' असे ठेवण्यात आले होते. मात्र, १० वर्षांच्या संसारानंतर तिने सासरच्या मंडळींवर छळ आणि मारहाणीचे गंभीर आरोप केले होते. एका मुलाखतीत तिने दावा केला होता की, "मला संमोहित करून लग्नासाठी प्रवृत्त करण्यात आले होते. हा छुप्या पद्धतीने केलेला 'लव्ह जिहाद' होता."
advertisement
विधीपूर्वक 'घरवापसी' आणि शुद्धीकरण
सततचा छळ सहन केल्यानंतर सायलीने आपल्या चार मुलांसह स्वधर्मात परतण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसांपूर्वीच पुण्यात खासदार मेधा कुलकर्णी, आमदार उमा खापरे आणि बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तिचे विधीपूर्वक शुद्धीकरण करण्यात आले होते. या 'घरवापसी'नंतर तिचे नाव 'अद्या सुर्वे' असे ठेवण्यात आले असून, तिने आपल्या चार मुलांनाही हिंदू धर्माची दीक्षा दिली होती.
शुद्धीकरणानंतर अवघ्या काही दिवसांतच सायली बेपत्ता झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तिच्या कुटुंबियांच्या मते, सासरच्या मंडळींनी तिचे अपहरण केले असण्याची दाट शक्यता आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी या घटनेचा निषेध करत सायलीचा शोध घेण्याची मागणी केली आहे.
