दोन टप्प्यांत होणार मेट्रो सुरू:
शिवाजीनगर ते हिंजवडी या २३ किलोमीटरच्या मार्गापैकी
पहिला टप्पा: हिंजवडी ते बालेवाडी फाटा (१२ किमी) - मे महिन्यात सुरू होईल.
दुसरा टप्पा: बालेवाडी फाटा ते शिवाजीनगर (११ किमी) - जुलै महिन्यात सुरू होईल.
का रखडले काम?
पंतप्रधानांच्या हस्ते २०१८ मध्ये या प्रकल्पाचा शिलान्यास झाला होता. मार्च २०२६ पर्यंत मेट्रो धावेल असा दावा 'पीएमआरडीए'ने (PMRDA) केला होता, मात्र तो फोल ठरला आहे. २३ पैकी सुमारे १० ते १२ स्थानकांची कामे अजूनही अपूर्ण आहेत. प्रवासी जिने, लिफ्ट आणि तांत्रिक चाचण्यांची प्रक्रिया बाकी असल्याने हा मुहूर्त तिसऱ्यांदा हुकला आहे. यामुळे आयटीयन्सना आणखी काही महिने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.
advertisement
मेट्रो भवनचे उद्घाटन:
रविवारी शिवाजीनगर येथे भव्य 'मेट्रो भवन'चे उद्घाटन करण्यात आले. ८,१५० चौ. मीटर क्षेत्रफळ असलेल्या या इमारतीत अत्याधुनिक नियंत्रण केंद्र आणि अनुभव केंद्र उभारण्यात आले आहे. यावेळी बोलताना फडणवीस यांनी पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी भविष्यात 'टनेल नेटवर्क' (बोगद्यांचे जाळे) उभारण्याचे संकेतही दिले.
