अपघात नसून आत्महत्या
सुरुवातीला हा घातपात किंवा अपघात असल्याची चर्चा होती, मात्र पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात या धक्कादायक घटनेमागचं वास्तव आता हळूहळू समोर येत आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेया गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तणावाखाली होती. तिच्या घरातील अंतर्गत कलह आणि कौटुंबिक वादामुळे तिची मनस्थिती ढासळली होती. याच मानसिक त्रासामुळे तिने थेट मुंबईवरून लोणावळा गाठलं आणि आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला.
advertisement
दोन्ही डिव्हाईस लॉक असल्याने तपासात अडथळे
शिवदुर्ग रेस्क्यू टीम, डॉग स्क्वॉड आणि ड्रोनच्या सहाय्याने 390 फूट खोल दरीतून तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस आता तांत्रिक पुराव्यांची वाट पाहत आहेत. श्रेयाचा मोबाईल आणि लॅपटॉप सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत, मात्र ते दोन्ही डिव्हाईस लॉक असल्याने तपासात मोठे अडथळे येत आहेत. टपरीमागे एक बॅग सापडली. ती बॅग श्रेयाची होती. या उपकरणांमधील डेटा अनलॉक झाल्यानंतरच तिच्या आत्महत्येपूर्वीच्या मनस्थितीबद्दल आणि अंतिम संवादाबद्दल अधिक स्पष्टता मिळू शकणार आहे. कौटुंबिक वादाचे नेमके स्वरूप काय होते, हे शोधणं आता पोलिसांसमोरचं मुख्य आव्हान आहे.
आत्महत्या असल्याचे प्राथमिक निष्कर्ष
दरम्यान, लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून तिथल्या पुराव्यांवरून ही आत्महत्या असल्याचे प्राथमिक निष्कर्ष काढले आहेत. श्रेया ही उच्चशिक्षित असूनही तिने कौटुंबिक वादातून हे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त होत आहे. सध्या पोलीस तिच्या कॉल रेकॉर्ड्स आणि सोशल मीडिया अकाऊंटची तपासणी करण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेत आहेत.
