पंचक कधी आणि कसे लागते?
ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र जेव्हा धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती या नक्षत्रांमध्ये प्रवेश करतो तेव्हा पंचक सुरू होतो. हा कालावधी एकूण पाच दिवसांचा असतो. पंचकाचे काही प्रकार आहेत. यावेळी फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या पंचकाला अग्नि पंचक म्हटले जाईल, जे अत्यंत अशुभ मानले जाते.
अग्नि पंचकाचा प्रभाव - ज्योतिषांच्या मते, अग्नि पंचकात आगीच्या घटना जास्त घडू शकतात. म्हणून, याकाळात विशेष काळजी घेतली पाहिजे आणि आगीशी संबंधित कोणतीही कृती करताना काळजी घेतली पाहिजे.
advertisement
पंचकाची वेळ - फेब्रुवारीतील पंचक २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४:२७ वाजता सुरू होईल आणि ते ३ मार्च रोजी संध्याकाळी ६:३९ वाजता संपेल. या काळात खालील काही कामे टाळावीत.
पंचक दरम्यान काय करू नये?
स्लॅब टाकू नये - तुम्ही नवीन घर बांधत असाल तर पंचकादरम्यान स्लॅब टाकू नका, अन्यथा त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात.
कोणतेही नवीन काम सुरू करू नका - पंचक दरम्यान कोणतेही नवीन काम सुरू करणे अशुभ आहे.
दक्षिण दिशेला प्रवास करू नका - दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते, म्हणून पंचक दरम्यान या दिशेला प्रवास केल्याने अपघात होण्याची शक्यता वाढते.
शुभ कामे करू नका - पंचकमध्ये, विशेषतः अग्नि पंचकात, लग्न, गृहप्रवेश आणि इतर शुभ कामे करू नयेत.
सव्वाबारा ते...! माघी संकष्टीला गणेश पूजेचा अभिजित मुहूर्त चुकवू नका; गणेश कृपा
पंचकमध्ये काय करावे?
शास्त्रांनुसार, पंचकाच्या वेळी भगवान विष्णू आणि शंकराची पूजा करावी जेणेकरून पंचकाचे नकारात्मक प्रभाव कमी होतील. यामुळे जीवनात शुभता राहते आणि त्रासांपासून मुक्तता मिळते.
वेळ आपली आहे आता! या 5 राशींची कमाई डबल; त्रिगृही योगात मोठी चिंता मिटणार,खुशखबर
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
