पितृदोष असेल तर -
कुटुंबातील कोणाची तरी तब्येत खराब होत राहणे. उपचार करूनही कुटुंबातील काही सदस्य नेहमी आजारी असणे हे पितृदोषाचे कारण असू शकते.
वारंवार अपघात -
पितृदोषामुळे घरातील व्यक्तींचा वारंवार अपघात होऊ शकतो. यासोबतच व्यक्तीच्या जीवनातील सर्व शुभ कार्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने अडथळे निर्माण होतात.
कुटुंबातील एखादी व्यक्ती अविवाहित राहणे -
advertisement
कुटुंबातील एखाद्याचे लग्न न होणे देखील पितृदोष असू शकतो. कुटुंबातील एखादी व्यक्ती लग्नासाठी पात्र आहे, परंतु लग्न जमत नाही. याशिवाय कुटुंबातील कोणतीही व्यक्ती जी लग्न करूनही घटस्फोट घेते किंवा काही कारणास्तव वेगळे राहते तो देखील पितृदोष असू शकतो.
संतती सुख न मिळणे- पितृ दोषाच्या अशुभ प्रभावामुळे संतती सुखात बाधा येते. मूल असले तरी ते मंद, दुर्बल किंवा अपंग असते.
सुख-सुविधांचा कारक शुक्राचे राशीपरिवर्तन! भाग्यवान ठरणार या 4 राशीची माणसं
कुटुंबात कलह : धन-संपत्तीने भरलेले असूनही कुटुंबात एकता नसणे, अशांततेचे वातावरण राहणे ही पितृदोषाची लक्षणे आहेत. पितृदोषामुळे कुटुंबात नेहमी कलहाची परिस्थिती असते, त्यामुळे व्यक्ती मानसिक तणावाखाली असते.
पितृदोषासाठी उपाय -
1. पूर्वजांच्या मृत्यूच्या तिथीला ब्राह्मणांना जेवण द्यावे आणि भक्तिभावाने दान करावे.
2. संध्याकाळी दक्षिण दिशेला दिवा लावा. रोज शक्य नसेल तर पितृपक्षात अवश्य लावावा.
3. जर कुंडलीत पितृदोष असेल तर यासाठी कुमारी मुलीचे लग्न लावा. लग्न करता येत नसेल तर गरीब मुलीच्या लग्नात मदत करा.
4. पितृदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी दक्षिण दिशेला पितरांचे चित्र ठेवा आणि रोज त्याचे स्मरण करा. यामुळे पितरांची नाराजी कमी होते आणि पितृदोषाचा प्रभावही कमी होऊ लागतो.
कधीही पैसे देऊनच घ्याव्यात या वस्तू! उधार, मागून घेतल्यानं पलटतात नशिबाचे फासे
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)