पूजा विधीत बेलपत्राचे महत्त्व - महादेवाला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये बेलपत्र प्रमुख आहे. याला बिल्वपत्र असेही म्हटले जाते. शिवलिंगावर बेलपत्र, भांग, धतुरा आणि पांढरी फुले अर्पण करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार बेलपत्राची तीन पाने ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानली जातात. महाशिवरात्रीला बेलपत्र अर्पण केल्याने शिवाची कृपा प्राप्त होते.
बेलपत्र कधी तोडावे -
advertisement
शास्त्रानुसार सोमवार आणि चतुर्दशी तिथीला बेलपत्र तोडू नये. महाशिवरात्री स्वतः चतुर्दशीला येते, म्हणून या दिवशी बेलपत्र तोडणे वर्जित मानले गेले आहे. महाशिवरात्री दिवशी बेलपत्र एक दिवस आधीच तोडून ठेवून द्यावे. महाशिवरात्री दिवशी बेलपत्र तोडल्यास शंकराची अवकृपा होऊ शकते. धार्मिक मान्यतेनुसार नियमांचे पालन करून बेलपत्र अर्पण केल्यास महादेवाची विशेष कृपा मिळते.
सोमवार शंकराच्या पूजेसाठी समर्पित आहे, परंतु याच दिवशी बेलपत्र तोडणे निषिद्ध सांगितले आहे. असे मानले जाते की सोमवारच्या दिवशी बेलवृक्षात माता पार्वतीचा वास असतो. अशा वेळी या दिवशी पाने तोडणे हा अनादर मानला जातो.
रविवार आणि द्वादशी तिथीचा नियम - स्कंद पुराणात असा उल्लेख मिळतो की रविवार आणि दोन्ही पक्षांच्या द्वादशी तिथीला देखील बेलपत्र तोडणे वर्जित आहे. मात्र, या दिवशी बेलवृक्षाची पूजा करणे शुभ मानले गेले आहे. असे केल्याने धन-समृद्धीत वाढ होते.
कोणत्याही महिन्यातील चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावस्या आणि संक्रांतीच्या तिथींना बेलपत्र तोडू नये. याशिवाय जेव्हा एक तिथी संपून दुसरी सुरू होत असते, त्या संधिकालमध्ये सुद्धा बेलपत्र तोडणे योग्य मानले जात नाही. प्रदोष व्रत, शिवरात्री आणि सोमवारच्या दिवशी देखील बेलपत्र तोडणे टाळावे.
बेलपत्र तोडताना या गोष्टी लक्षात ठेवा -
बेलपत्र तोडताना झाडाची संपूर्ण फांदी कधीही तोडू नका. एक-एक पान तोडणे शुभ मानले जाते. बेलवृक्षाची पाने तोडण्यापूर्वी भगवान शिव यांचे स्मरण जरूर करावे. बेलपत्र घेतल्यानंतर वृक्षाला नमस्कार अवश्य करावा. शंकराला किमान एक बेलपत्र अर्पण केले जाऊ शकते. शक्य असल्यास 11 किंवा 21 च्या संख्येतही पाने वाहता येतात.
सुखाची लाईफ..! बुध-गुरुचा नवपंचम योग 5 राशींना लकी, आनंदाला उरणार नाही पारावार
शिवलिंगावर नेहमी तीन पाने असलेले बेलपत्रच अर्पण करावे. जर 5 पाने असलेले बेलपत्र मिळाले तर ते अतिशय उत्तम मानले जाते. शिवलिंगावर स्वच्छ, न फाटलेली आणि डाग नसलेली बेलपत्रेच वाहावीत. बेलपत्र अर्पण करण्यापूर्वी ते चांगल्या प्रकारे धुवून स्वच्छ करून घ्यावे. नेहमी ताज्या तोडलेल्या बेलपत्रांचाच पूजेत उपयोग करण्याचा प्रयत्न करा.
