TRENDING:

Mysterious Temple: आश्चर्यच! भारतातील अनोखं मंदिर, तिथं अंतराळी आहे खांब! शास्त्रज्ञांनाही कोडं नाही सुटलेलं

Last Updated:

Mysterious Temple: लेपाक्षी मंदिर ज्याला वीरभद्र मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हे भारताच्या प्राचीन स्थापत्यकलेचे एक भव्य उदाहरण आहे. हे मंदिर दगडात कोरून बांधलेले आहे आणि विजयनगर साम्राज्याच्या अद्भुत कला आणि कारागिरीचे प्रतिबिंब आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : भारतामध्ये अनेक अद्भुत आणि रहस्यमय मंदिरे आहेत, त्यांच्याबद्दल विविध श्रद्धा आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका विशेष मंदिराबद्दल सांगणार आहोत. आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील लेपाक्षीचे वीरभद्र मंदिर हा इतिहास, सुंदर वास्तुकला आणि अध्यात्माने परिपूर्ण एक लपलेला खजिना आहे. हे प्राचीन मंदिर शंकराचे अवतार वीरभद्र यांना समर्पित आहे. लेपाक्षी मंदिर ज्याला वीरभद्र मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हे भारताच्या प्राचीन स्थापत्यकलेचे एक भव्य उदाहरण आहे. हे मंदिर दगडात कोरून बांधलेले आहे आणि विजयनगर साम्राज्याच्या अद्भुत कला आणि कारागिरीचे प्रतिबिंब आहे.
News18
News18
advertisement

या मंदिराची अनोखी रचना, धार्मिक कथा आणि शांत वातावरण यामुळे येथे जाण्याचा अनुभव अधिक खास बनतो. वीरभद्र मंदिरात अतिशय सुंदर भित्तीचित्रे आणि चित्रे आहेत. हे मंदिर कुर्मश्याम नावाच्या एका लहान टेकडीवर बांधले आहे, ज्याचा अर्थ कासवाच्या आकाराच्या टेकडी आहे.

पौराणिक कथेनुसार, हे मंदिर महर्षी अगस्त्य यांनी बांधले होते. येथे गणेश, नंदी, वीरभद्र, शिव, भद्रकाली, विष्णू आणि लक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत. असे मानले जाते की, रावणाशी झालेल्या युद्धानंतर जटायू पक्षी जखमी झाला तेव्हा तो याच ठिकाणी पडला आणि श्रीरामांनी त्याला "ले पक्षी" म्हणजे "उठ पक्षी" असे म्हटले. तेव्हापासून या ठिकाणाला लेपाक्षी असे नाव पडले. येथे एक असे ठिकाण आहे जिथे माता सीतेच्या पावलांचे ठसे आहेत, असे मानले जाते.

advertisement

धार्मिक महत्त्वाव्यतिरिक्त, हे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या देखील अत्यंत खास आहे. त्याच्या भिंतींवरील कोरीवकाम हिंदू धर्मातील कथा दर्शवते आणि विजयनगर साम्राज्याच्या कला आणि स्थापत्यकलेची महानता उलगडते. मंदिरात फिरताना तुम्हाला विजयनगर साम्राज्याची समृद्ध कला आणि संस्कृती पाहता येईल. मंदिराच्या एका कोपऱ्यात एक गुहा आहे, जिथे महर्षी अगस्त्यांनी तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते.

advertisement

झुलणारा खांब हे येथील गूढ रहस्य आहे. मंदिरात सुमारे ७० दगडी खांब आहेत, परंतु यापैकी प्रत्येक खांब जमिनीशी जोडलेला नाही. त्याच्या पाया आणि जमिनीमध्ये एक लहान जागा आहे. लोक तिथे कापड किंवा रुमाल ठेवू शकतात आणि ते दुसऱ्या बाजूने बाहेर काढू शकतात. हे पाहून पर्यटक आश्चर्यचकित होतात.

आत्मविश्वास ढासळत होता, आव्हाने मोठमोठी! या राशींचे आता चमकणार नशीब; शनिकृपा

advertisement

असे सांगितले जाते की, ब्रिटीश राजवटीत एका इंग्रजी अभियंत्याने याचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला आणि खांब हलवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला काहीच समजले नाही. तेव्हापासून, हा खांब कसा हलतो हे कोणालाच समजले नाही.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

वीरभद्र मंदिरात कसे पोहोचायचे - वीरभद्र मंदिर आंध्र प्रदेशातील लेपाक्षी शहरात आहे. रस्त्याने सहज पोहोचता येते. बेंगळुरू आणि हैदराबादसारख्या मोठ्या शहरांमधून येथे बस आणि टॅक्सी उपलब्ध आहेत. जर तुम्ही विमानाने प्रवास करत असाल, तर जवळचे विमानतळ बेंगळुरूमध्ये आहे. तिथून टॅक्सी किंवा बसने मंदिरात पोहोचता येते. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी जवळचे रेल्वे स्टेशन हिंदूपूर आहे. तिथून टॅक्सी किंवा लोकल बसने मंदिरापर्यंत पोहोचता येते.

मराठी बातम्या/अध्यात्म/
Mysterious Temple: आश्चर्यच! भारतातील अनोखं मंदिर, तिथं अंतराळी आहे खांब! शास्त्रज्ञांनाही कोडं नाही सुटलेलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल