उन्नावचे ज्योतिषी ऋषिकान्त मिश्रा यांच्या मते, आनंदी जीवन जगायचं असेल आणि तणावमुक्त राहायचं असेल, तर तुम्ही काही वास्तू उपाय करू शकता. यामुळे तुम्ही आयुष्यभर तणावापासून दूर राहू शकता.
नकारात्मकता दूर करण्यासाठी...
दिवसातून थोडा वेळ वायव्य दिशेच्या पश्चिमेला घालवा. वास्तूशास्त्रानुसार, ही जागा भूतकाळातील वाईट आणि नकारात्मक प्रभाव दूर करण्यास मदत करते. यामुळे उच्च रक्तदाब, तणाव आणि नैराश्यापासून दूर राहण्यास मदत होईल.
advertisement
ईशान्य दिशा स्वच्छ ठेवा
घराची ईशान्य दिशा स्वच्छ आणि टापटीप ठेवा. या दिशेला चांगला प्रकाश हवा. असं म्हणतात की, या दिशेला भगवान शिव वास करतात. मान्यतेनुसार, भगवान शिव नकारात्मकता दूर करणारे मानले जातात. तसेच, भगवान शिवाची पूजा केल्याने तणाव दूर होतो.
गुरु ग्रहाची पूजा करा
नकारात्मकता दूर करण्यासाठी घराची ईशान्य दिशा नियमित स्वच्छ करा. गुरु ग्रह किंवा बृहस्पती देव मानसशास्त्राचे शासक आहेत. ते मन, विचार इत्यादींवर नियंत्रण ठेवतात. तणाव आणि नैराश्यापासून दूर राहण्यासाठी ही जागा स्वच्छ ठेवणं महत्त्वाचं आहे. तसेच, बृहस्पती देवाची पूजा करा.
लॅव्हेंडर रंगाचा वापर
तणाव कमी करण्यासाठी वास्तू लॅव्हेंडर रंग वापरण्याची शिफारस करते. जर तुम्हाला तणाव असेल, तर तुम्ही लॅव्हेंडर रंगाचे कपडे घाला. यामुळे तुम्हाला शांती मिळेल आणि तुमच्या जीवनात आनंद येईल.
पांढरा रंग शांतता देतो
पांढरा रंग शांततेचं प्रतीक आहे. या रंगाचा वापर केल्याने तुम्हाला तणावातून आराम मिळू शकतो. वास्तूशास्त्रानुसार, हा रंग तुमचं मानसिक आरोग्य चांगलं ठेवू शकतो आणि तुमचा तणाव कमी करू शकतो.
हे ही वाचा : पूजा करताना 'हे' 4 संकेत मिळाले, तर चुकूनही करू नका दुर्लक्ष! प्रेमानंद महाराज सांगतात...
हे ही वाचा : Vastu Tips : घराच्या भिंतीवर उगवलाय पिंपळ? तर सावधान! हा उपाय केल्यानेच दूर होतो वास्तुदोष
