या उपक्रमात अनेक तरुण उत्साहाने सहभागी होत असून, स्वच्छतेबरोबरच नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावरही त्यांचा भर आहे. गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या मोहिमेमुळे शहरात सकारात्मक बदल घडताना दिसत आहे. स्वच्छ शहर, सुंदर शहर हा संदेश केवळ घोषवाक्य न राहता कृतीतून साकार होत असल्याचे या उपक्रमातून स्पष्ट होते.
निखिल खंडेलवाल यांनी नागरिकांना आवाहन करत सांगितले की, आपण सर्वांनी फिरायला आल्यानंतर हातात एक पिशवी घेऊन यावी. आपल्या आसपास दिसणारा कचरा आपणच उचलून स्वच्छता राखावी. आपली जबाबदारी आपणच पार पाडली, तर आपले शहर अधिक स्वच्छ आणि सुंदर होईल.
advertisement
या ग्रुपचे इंस्टाग्राम वर संभाजीनगर फ्लावर्स नावाने इन्स्टा पेज आहे. याच्यावरून सर्वजण एकत्र येत असतात आणि त्यामुळे त्यांचे सर्व कार्यक्रम करत असतात. तर तुम्ही देखील यांच्या ग्रुपला सामील होऊ शकता आणि जर तुम्हाला साफसफाई करायची असेल तर तुम्ही त्यांच्या सोबत नक्कीच सामील होऊ शकता.





