TRENDING:

Asia Cup : भारताची Final मॅच कोणाविरुद्ध होणार? एक नॉक ऑऊट लढत ठरवणार प्रतिस्पर्धी

Last Updated:

Asia Cup 2025: भारताने दुबईतील आशिया कप सुपर 4 मध्ये पाकिस्तान व बांगलादेशला हरवून फायनलमध्ये प्रवेश केला. फायनलमध्ये भारताची लढत पाकिस्तान किंवा बांगलादेशशी होणार.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

दुबई: भारताने आशिया कपच्या सुपर 4 मधील पहिल्या दोन्ही मॅच जिंकून स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दुबईत झालेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा पराभव केला. याआधी भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. भारताची लढत अंतिम सामन्यात कोणाविरुद्ध होणार याचा निर्णय उद्या म्हणजे गुरुवारी होणार आहे. ही लढत पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात होईल.

advertisement

स्पर्धेतील सुपर 4 फेरीत श्रीलंकेने 2 लढती गमावल्याने त्यांचे आव्हान संपुष्ठात आले आहे. तर पाकिस्तान आणि बांगलादेश यांचे प्रत्येकी 2 गुण आहे. यापैकी जो संघ उद्या जिंकणार तो भारताविरुद्ध फायनलमध्ये खेळले. उद्या जर पाकिस्तानने बाजी मारली तर या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरी लढत पहायला मिळेल. नाही तर भारत आणि बांगलादेश यांच्यात फायनल होईल. आशिया कपची फायनल मॅच रविवारी २८ सप्टेंबर रोजी होणार आहे.

advertisement

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत 25 टी-20 मॅच झाल्या असून त्यात पाकने 20 तर बांगलादेशने 5 मध्ये विजय मिळवला आहे. आकडेवारीत पाकिस्तानचे पारडे जड असेल तरी बांगालादेशचा संघ पाकला धक्का देऊ शकतो.

advertisement

सुपर 4 मधील अखेरची लढत भारत आणि श्रीलंका यांच्यात 26 सप्टेंबर रोजी होणार आहे. मात्र ही फक्त एक औपचारीकता असेल कारण भारत आधीच फायनलमध्ये पोहोचला तर श्रीलंका स्पर्धेतून बाहेर पडली आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup : भारताची Final मॅच कोणाविरुद्ध होणार? एक नॉक ऑऊट लढत ठरवणार प्रतिस्पर्धी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल