खरं तर आज फायनलच्या तिसऱ्या दिवशी जम्मू काश्मीरचा पहिला डाव हा 584 धावांवर ऑल आऊट झाला होता. त्यानंतर कर्नाटक जम्मूला कडवी झूंज देईल असे वाटत होते. पण आकिब नबीच्या गोलंदाजीसमोर कर्नाटकने पहिल्या बॉलपासून गुडघे टेकल्याचे दिसले. कारण डावाच्या चौथ्या ओव्हरला कर्नाटकने 4 धावा काढल्या होत्या. त्यामुळे कर्नाटक दबावात खेळत होती, हे स्पष्ट झालं.
advertisement
त्यानंतर आकिब नबीने केएल राहुलला खतरनाक बॉल टाकला, जो त्याला खेळताच आला नाही. आणि त्याच्या बॅटीला बॉल चाटून थेट विकेटकिपरच्या हातात बॉल गेला होता. त्यामळे टीम इंडियाचा केएल राहुल 13 धावांवर बाद झाला होता. राहुल बाद केल्यानंतर आकिब नबीने करुण नायरचा काटा काढला. राहुलप्रमाणेच आकिबने टाकलेला बॉलला करूण नायरला कळालाच नाही आणि त्याने ऑफस्टम्प उडवला.
कर्नाटकचे दोन मोठे विकेट घेऊन आकिब शांत बसला नाही.त्याने करूण नायरनंतर मैदानात आलेल्या स्मरण रविचंद्रनला उलट्या पायाने माघारी धाडले होते.आकिबने टाकलेल्या बॉलवर खेळताना स्मरण वाधवानच्या हातात कॅच देऊन बसला होता.आकीबसोबत सुनील कुमारने कॅप्टन देवदत्त पड्डीकलची विकेट घेतली होती.
सध्या मयंक अग्रवाल आणि श्रेयस गोपाल मैदानात असून त्यांनी कर्नाटकचा डाव सावरला आहे.त्यामुळे कर्नाटक किती धावांपर्यंत मजल मारते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
