TRENDING:

बांगलादेशचा खेळ खल्लास, T20 वर्ल्ड कपमधून आयसीसीने हाकललं, नव्या टीमची एन्ट्री!

Last Updated:

बांगलादेश 2026 टी-20 वर्ल्ड कपमधून अधिकृतपणे बाहेर पडला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बांगलादेश 2026 टी-20 वर्ल्ड कपमधून अधिकृतपणे बाहेर पडला आहे. आयसीसीने बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडचा स्पर्धेत समावेश झाल्याची पुष्टी केली आहे. आयसीसीने बांगलादेशला एका पत्राद्वारे याची माहिती दिली आहे. बांगलादेशला वगळल्यानंतर, स्कॉटलंडला 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये स्थान देण्यात आले आहे. स्कॉटलंडचा समावेश ग्रुप सी मध्ये करण्यात आला आहे, जिथे ते इंग्लंड, वेस्ट इंडिज, नेपाळ आणि इटली या टीमविरुद्ध खेळतील.
बांगलादेशचा खेळ खल्लास, T20 वर्ल्ड कपमधून आयसीसीने हाकललं, नव्या टीमची एन्ट्री!
बांगलादेशचा खेळ खल्लास, T20 वर्ल्ड कपमधून आयसीसीने हाकललं, नव्या टीमची एन्ट्री!
advertisement

आयसीसी मतदानात बांगलादेशचा पराभव

बांगलादेश आणि आयसीसी यांच्यातील वाद जवळजवळ तीन आठवड्यांपासून सुरू होता. बांगलादेशने भारतात वर्ल्ड कपचे सामने न खेळण्याचा आणि त्यांचे सामने श्रीलंकेत हलवण्याचा आग्रह धरला. पण, सामने भारतामध्येच खेळावे लागतील, असं आयसीसीने ठणकावून सांगितलं.

अखेर, आयसीसी बोर्डाने 14-2 बहुमताने बांगलादेशचे सामने भारतात आयोजित करण्यास मान्यता दिली. स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकनाने धोक्याची पातळी "कमी ते मध्यम" असल्याचे निश्चित केले.

advertisement

हा संपूर्ण वाद आयपीएल लिलावानंतर सुरू झाला. कोलकाता नाईट रायडर्सने बांगलादेशी फास्ट बॉलर मुस्तफिजूर रहमानला 9.20 कोटी रुपयांना टीममध्ये सामील केले. पण, बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचारांच्या वृत्तांमुळे भारतात याला विरोध झाला. त्यानंतर, बीसीसीआयने रहमानला आयपीएलमधून बाहेर केले.

बीसीसीआयच्या या निर्णयामुळे बांगलादेश बोर्ड संतप्त झाले आणि त्यांनी वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. बीसीबीने आयसीसीला पत्र लिहून म्हटले की ते भारतात त्यांचे सामने खेळणार नाहीत. त्यांनी त्यांचे सामने श्रीलंका किंवा पाकिस्तानमध्ये हलवण्याची मागणी केली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पोरांच्या गर्दीत लक्ष्मीने सगळ्यांना टाकलं मागे, 12 मिनिटात जिंकला शंकरपट, Video
सर्व पहा

बांगलादेशने असा युक्तिवाद केला की त्यांच्या खेळाडूंची सुरक्षितता भारतात धोक्यात येऊ शकते. पण, आयसीसीने त्यांच्या सुरक्षा अहवालात कोणताही संभाव्य धोका नाकारला. शेवटी, आयसीसीने स्पष्ट केले की बांगलादेशला भारतात सामने खेळावे लागतील. जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांना काढून टाकले जाईल. बांगलादेशने भारतात न खेळण्याची भूमिका कायम ठेवली, तेव्हा आयसीसीने बांगलादेशला वर्ल्ड कपमधून बाहेर करत स्कॉटलंडचा संधी दिली आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
बांगलादेशचा खेळ खल्लास, T20 वर्ल्ड कपमधून आयसीसीने हाकललं, नव्या टीमची एन्ट्री!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल