खरं तर वेस्ट इंडिजने दिलेल्या 195 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला आज मैदानात दोन्ही सलामीविरांकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण अभिषेक शर्माने टीम इंडियाला दगा दिला होता. कारण तो अवघ्या 10 धावा करून बाद झाला होता. अभिषेकची ही बॅटींग पाहून डगआऊटमध्ये बसलेला गंभीर प्रचंड नाराज झाला होता. त्यामुळे त्याची रिअॅक्शन व्हायरल होते आहे.
advertisement
अभिषेक बाद झाल्यानंतर तो डगआऊटच्या दिशेने येत होता. त्यावेळी गंभीरवर कॅमेरा पडताच तो धीरगंभीरल होता आणि आतून प्रचंड चिडलेला होता पण कॅमेरा समोर येताच त्याने मान फिरवली. तर आपल्या खराब कामगिरीमुळे अभिषेक शर्मा मान टाकून निघून गेला होता.
अभिषेक शर्मानंतर ईशान किशनही 10 धावांवर बाद झाला होता. त्यामुळे संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादवने भारताचा डाव सावरला होता. या दरम्यान संजू सॅमसनने अर्धशतकीय खेळी केली होती. त्यानंतर संजूने एका बाजूने डाव सावरला असताना कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या हातून मोठी चूक झाली तो बाऊंड्री लाईनवर कॅच देऊन बसला होता.
कॅप्टन सूर्या बाद झाल्यानंतर तिलक वर्मा मैदानात आला होता,पण 27 धावा करून बाद झाला. त्याच्यानंतर हार्दिक पांड्या मैदानात आला होता. टीम इंडियाचे एका मागून एक विकेट पडत असताना संजू सॅमसनने एकाबाजूने भारताचा डाव सावरला आणि टीम इंडियाला विजयापर्यंत खेचून नेलं.या दरम्यान त्याने 50 बॉल 97 धावांची नाबाद आणि मॅच विनिंग खेळी केली.
या विजयानंतर टीम इंडिया सेमी फायनलला पोहोचली आहे. टीम इंडियाता सेमी फायनलचा सामना हा इंग्लंड विरूद्ध असणार आहे. हा सामना 4 मार्चला रंगणार आहे.
