खरं तर वेस्ट इंडिजचा शाई होप बाद झाल्यानंतर संघाची संपू्र्ण भिस्त ज्या खेळाडूवर होती तो शिमरन हेटमायर मैदानात आला होता.भारताविरूद्ध तो खतरनाक फलंदाजी करेल असे वाटत होते. पण भारतानो त्याला 27 धावातच गुंडाळले होते. त्याचं झालं असं की भारताने शिमरन हेटमायरला आधीट बुमराहला राखीव करून ठेवले होते. त्यामुळे तो फलंदाजीला येताच बुमराहला पाचारण करण्यात आलं होतं.
advertisement
बुमराहच्या पहिल्या दोन बॉलनंतर तिसऱ्या बॉलवर हेटमायर बॉल मारत असताना त्याच्या बॅटीला कड लागून संजू सॅमसनच्या हातात गेली होती. विशेष म्हणजे बॅटीला कड लागल्याचा आवाज आल्याने अंपायरने देखील लगेच आऊट दिले होते. पण शिमरन हेटमायरने क्षणाचाही विलंब न लावता रिव्ह्यू घेतला. या रिव्हयूमध्ये अल्ट्राएजमध्ये हेटमायरच्या बॅटीला कड लागल्याचे स्पष्ट दिसत असल्याने थर्ड अंपायरने देखील त्याला आऊट दिले. पण हा निर्णय हेटमायरला मान्यच नव्हता. वेस्ट इंडिजचा कोच डॅरने सेमी देखील डगआऊटमध्ये आश्चर्यचकीत झाला होता.त्यामुळे मैदानात मोठा ड्रामा झाला होता.
दरम्यान हेटमायर हा जसप्रीत बुमराहचा शिकार आहे. आतापर्यत 23 बॉलमध्ये बुमराहने हेटमायरला 6 वेळा आऊट केली होती. तसेच या विकेटनंतर बुमराहने रॉस्टन चेसला बाद केले होते. रॉस्टन चेसने उंचावर बॉव मारला, पण जास्त जोरात न मारल्याने सूर्याने हवेत झेप घेऊन भन्नाट कॅच घेतली होती. या कॅचमुळे भारताला एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट मिळाल्या होत्या.
