रहाणे आणि रघुवंशीशिवाय केकेआरचा ओपनर फिन ऍलनने 17 बॉल 37 आणि रिंकू सिंगने 21 बॉलमध्ये नाबाद 33 रन केले. मुंबईकडून शार्दुल ठाकूरने 3 आणि हार्दिक पांड्याने एक विकेट घेतली.
मुंबईकरांचा धमाका
अंगक्रिश रघुवंशी आणि अजिंक्य रहाणे हे मुंबईकर आहेत. अंगक्रिश आणि रहाणे दोघंही मुंबईकडून रणजी ट्रॉफीमध्ये खेळतात, त्यामुळे त्यांना वानखेडे स्टेडियमचा कोपरा न कोपरा माहिती आहे, याचाच फायदा त्यांना या सामन्यात झाला.
advertisement
काय म्हणाला अंगक्रिश रघुवंशी?
इनिंग संपल्यानंतर अंगक्रिश रघुवंशीने खेळपट्टी बॅटिंगला चांगली असल्याची प्रतिक्रिया दिली. 'पिच बॅटिंगसाठी चांगलं आहे, पण स्लो बॉल बॉलरना मदत करत आहे. आम्ही चांगली बॉलिंग केली तर मॅच जिंकू. मी सुरूवातीला संघर्ष करत होतो, पण सुदैवाने टाईम आऊट झाला. अभिषेक सर आणि अज्जू भैय्यांनी मला खंबीर राहायला सांगितलं. बॉलवर लक्ष ठेव जास्त दडपण घेऊ नकोस. वानखेडेवर रन येतच राहतील, असं ते मला सतत सांगत होते. याचा मला फायदा झाला', असं अंगक्रिश रघुवंशी म्हणाला.
'बुमराहच्या बॉलिंगवर मारलेला स्वीप शॉट मला आवडला. या खेळपट्टीवर स्पिन बॉलिंगसाठी फार काहीही नाही, पण आमचे स्पिन बॉलर काचेच्या खेळपट्टीवरही बॉलिंग करू शकतात', असं वक्तव्य अंगक्रिश रघुवंशीने केलं आहे.
