20 ओव्हर्समध्ये 209 रन्सचा डोंगर
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या मॅचमध्ये भारताने पहिले बॅटिंग करताना 20 ओव्हर्समध्ये 209 रन्सचा डोंगर उभा केला होता. भारताकडून इशान किशनने 61 आणि हार्दिक पंड्याने 52 रन्सची तुफानी खेळी केली. नामिबियाकडून स्वतः इरास्मसने 20 रन्स देऊन 4 विकेट्स घेतल्या होत्या. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना नामिबियाने पॉवरप्लेमध्ये 57 रन्स बनवले होते, पण त्यानंतर वरुण चक्रवर्तीने 2 ओव्हर्समध्ये केवळ 7 रन्स देत 3 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.
advertisement
कुणावर फोडलं पराभवाचं खापर
इरास्मसने मॅच संपल्यानंतर सांगितले की, पॉवरप्लेनंतर मला वाटलं होतं की दव पडल्यामुळे स्पिनर्सना बॉल पकडणे कठीण जाईल आणि आम्हाला संधी मिळेल. 26 ओव्हर्सच्या खेळानंतर आम्ही मॅचमध्ये होतो, पण वरुणच्या त्या स्पेलने आमचा पूर्ण गेम खराब केला. 6 ते 10 ओव्हर्सच्या दरम्यान आमचे बॅक बोन तुटले आणि तिथून सावरणे कठीण झाले, असं म्हणत त्याने वरुण चक्रवर्तीवर पराभवाचं खापर फोडलं.
टीममध्ये स्पेशलायझेशनची गरज
नामिबियाच्या डेथ ओव्हर्समधील बॉलिंगबद्दल इरास्मसने जेजे स्मितचे कौतुक केलं. तो म्हणाला की, सुरुवातीला काही रन्स लीक झाले असले तरी स्मितने शेवटी ज्या पद्धतीने बॉलिंग केली, ती कौतुकास्पद आहे. आम्हाला आमच्या टीममध्ये अशाच स्पेशलायझेशनची गरज आहे. मोठ्या टीम्सविरुद्ध खेळताना आम्हाला डावाची सुरुवात आणि शेवट अधिक चांगल्या दर्जाचा करावा लागेल, असंही तो म्हणाला.
आमच्या बॅटिंगमध्ये ताकद
दरम्यान, आमच्या बॅटिंगमध्ये ताकद आहे, पण आम्हाला सुरुवातीला थोडा वेळ खेळून पाया भक्कम करण्याची गरज आहे. चेन्नईची परिस्थिती आम्हाला अनुकूल ठरू शकते आणि अजूनही स्पर्धेत खूप काही साध्य करणं बाकी आहे, असं म्हणत त्याने आगामी मॅचमध्ये विजयाची आशा व्यक्त केलीय.
