अभिषेक शर्माने सूत्र हाती घेतली अन्...
टीम इंडियाने न्यूझीलंडने दिलेले 154 धावांचे लक्ष्य केवळ 10 ओव्हरमध्ये पूर्ण करून हा मॅच जिंकला. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताची सुरुवात धक्कादायक झाली होती, कारण संजू सॅमसन पहिल्याच बॉलवर शून्यावर बाद झाला. मात्र, त्यानंतर अभिषेक शर्माने सूत्र हाती घेत किवी बॉलरची धुलाई सुरू केली आणि मॅच पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकवला.
advertisement
अभिषेक शर्माची बॅट चेक केली
टीम इंडियाने 10 ओव्हर राखून टी-ट्वेंटी सामना जिंकल्याने आता ऑस्ट्रेलियासह इतर सर्व संघ धोक्याची घंटा मोजत आहेत. अशातच तिसरा सामना जिंकल्यानंतर न्यूझीलंडच्या प्लेयर्सने चक्क अभिषेक शर्माची बॅट चेक केली. अभिषेकने देखील आनंदाने बॅट न्यूझीलंडच्या प्लेयर्सला दिली. त्यावर सोशल मीडियामधून मजेशीर कमेंट्स येत आहेत. भावा तुझ्या बॅटमध्ये स्प्रिंग तर नाही ना? असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केलाय.
14 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण
अभिषेकने या खेळीदरम्यान युवराज सिंगचा विक्रम मोडण्यापासून थोडक्यात हुलकावणी दिली. त्याने 14 बॉलमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले, जे भारतीय फलंदाजाकडून टी-ट्वेंटी क्रिकेटमधील दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले आहे. युवराज सिंगने 2007 च्या वर्ल्ड कपमध्ये 12 बॉलमध्ये अर्धशतक झळकावण्याचा रेकॉर्ड अद्याप अबाधित राखला असून अभिषेक आता त्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.
अभिषेक म्हणाला...
अभिषेक म्हणाला की, टीमची जी गरज आहे ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करतो. प्रत्येक वेळी असे खेळणे सोपे नसते, पण ड्रेसिंग रूममधील वातावरण आणि मानसिक तयारी खूप महत्त्वाची असते. युवराज पाजींचा 12 बॉलचा रेकॉर्ड मोडणे जवळजवळ अशक्य आहे, पण सध्या ज्या प्रकारे सर्व फलंदाज खेळत आहेत, ते पाहता भविष्यात काहीही होऊ शकतं.
भविष्यातील सर्वात मोठा मॅच विनर
दरम्यान, या मॅचमधील विजयामुळे भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या या टी-२० मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. अभिषेक शर्माच्या या इनिंगमुळे त्याच्याकडे टीम इंडियाचा भविष्यातील सर्वात मोठा मॅच विनर म्हणून पाहिले जात आहे. विशेष म्हणजे त्याने या सिरीजमध्ये अनेक मोठे विक्रम मोडीत काढले असून त्याची स्ट्राईक रेट सर्वांनाच थक्क करणारी आहे.
