हातात मॅच होती पण पावरप्लेमध्ये...
टीम इंडियाच्या बॉलिंगवर सूर्यकुमार यादवची नाराजी नाहीये. पण बॅटिंगवर सूर्या निराश आहे. टीम इंडियाच्या हातात मॅच होती पण पावरप्लेमध्ये असा कोणता निर्णय घेतला गेला? ज्यामुळे टीम इंडियाच्या हातातून मॅच निसटली. तर तो प्लॅन होता गौतम गंभीरचा... गंभीरच्या डोक्यातून सुनील नारायणची रणनिती जातच नाहीये, असं दिसतंय. एखादा ऑलराऊंडरच मॅच जिंकवू शकतो, असं गंभीरला वाटतंय. याचा फटका टीम इंडियाला बसला.
advertisement
वॉशिंग्टन सुंदरने माती खाल्ली
बॅटिंगमध्ये पावरप्लेनंतर टीम इंडियाला ज्यावेळी काऊंटर अटॅक करण्याची गरज होती. त्यावेळी गंभीरने सेफ गेम खेळला अन् वॉशिंग्टन सुंदर, ज्याला गंभीर प्रॉपर बॅटर समजतो, त्याला वरती पाठवलं. पण वॉशिंग्टन सुंदरने माती खाल्ली. वॉशिंग्टनने 11 बॉलमध्ये 11 धावा करत घरचा रस्ता पकडला. त्याऐवजी टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन अक्षर पटेल असता तर त्याने इंनिगं सांभाळण्याची जबाबदारी खांद्यावर घेतली असती किंवा रिंकु संग याला आक्रमण करण्यासाठी वरच्या क्रमांकावर पाठवणं गरजेचं होतं.
रोहित शर्माच्या वर स्थान दिलं पण...
दरम्यान, बीसीसीआय वॉशिंग्टन सुंदरकडे आगामी स्टार म्हणून बघत आहे. गंभीरच्या नरजेत देखील तो प्रॉपर बॅटर आहे पण वॉशिंग्टन अशा परिस्थितीत मॅचविनरची भूमिका बजावू शकत नाही. बीसीसीआयने त्याला 2 कोटी अधिकचे देऊन त्या वार्षिक करारात ग्रेड B मध्ये रोहित शर्माच्या वर स्थान दिलंय. त्यामुळे त्याच्याकडून मॅचविनिंगची अपेक्षा ठेवणे गैर नाही. अशातच आता वॉशिंग्टनने सर्वांना निराश करत टीम इंडियाच्या अपेक्षा भंग केल्या आहेत.
