एक दोन नाही तर तीन चुका
टीम इंडियाचा स्टार ओपनर आणि विकेटकीपर संजू सॅमसन याने झिम्बाब्वेविरुद्ध एक दोन नाही तर तीन चुका केल्या. बॅटिंग तर संजूने फस्ट क्लास केली पण विकेटकिपिंगमध्ये संजूने घोडचुका केल्या ज्या सूर्यकुमार खपवून घेणार नाही. संजू डीआरएस घेताना चुकतोय, असं स्पष्ट चित्र दिसू लागलंय. संजूने सातव्याच ओव्हरमध्ये टीम इंडियाचा एक डीआरएस वाया घालवला होता. तर 17 व्या ओव्हरमध्ये देखील अर्शदीपला विकेट मिळत असताना डीआरएस घेऊ नको, असं संजूने कॅप्टन सूर्याला सांगितलं होतं. त्यामुळे संजू डीआरएस घेताना चुकतोय, हे स्पष्ट झालं आहे.
advertisement
ईशान किशनला संधी मिळणार
अशातच आता ईशान किशनलाच आगामी सामन्यात विकेटकीपर म्हणून उभं केलं जाण्याची शक्यता आहे. विकेटकीपर फिल्डर म्हणून संजू खूप चांगला असता तरी त्याचं निरीक्षण टीम इंडियासाठी वर्ल्ड कप बुडवू शकतं. त्यामुळे आता ईशान किशन याच्यावरच जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर आता संजूला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध कशी असेल प्लेईंग इलेव्हन?
दरम्यान, संजू सॅमसनने बॅटिंगमध्ये कमालीचं प्रदर्शन केलं. त्याने 15 बॉलमध्ये 24 धावांची खेळी केली. तर संजूमुळे अभिषेक शर्मा देखील फॉर्ममध्ये आला. अभिषेकने 30 बॉलमध्ये 55 धावांची खेळी केली. तर वन डाऊनला आलेल्या ईशान किशनने 24 बॉलमध्ये 38 धावा चोपल्या. त्यामुळे आता वेस्ट इंडिजविरुद्ध देखील अशीच प्लेईंग इलेव्हन खेळवली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
