भारताविरुद्धच्या या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने आपण टॉस जिंकला असता तरी बॅटिंगच घेतली असती, अशी प्रतिक्रिया दिली. मागच्या दोन्ही सामन्यांमध्ये आम्ही पहिले बॅटिंगकरून मॅच जिंकलो आहे, त्यामुळे आम्हाला यात कोणतेही बदल करायचे नव्हते, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
advertisement
जय शाहांची सूचक पोस्ट
भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या या सामन्याआधी आयसीसीचे प्रमुख जय शाह यांनी सूचक पोस्ट केली आहे. सामन्याचा टॉस पडण्याच्या 14 मिनिटं आधी जय शाह यांनी एक्सवर महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! भगवान शिवाची दिव्य ऊर्जा तुमचे जीवन शांती, समृद्धी आणि आनंदाने भरून टाको. ओम नमः शिवाय!', असं जय शाह म्हणाले आहेत.
पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात टीम इंडियाने दोन बदल केले आहेत. कुलदीप यादव आणि अभिषेक शर्मा यांचं भारतीय टीममध्ये कमबॅक झालं आहे. तर अर्शदीप सिंग आणि संजू सॅमसन यांना बाहेर बसावं लागलं आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमची खेळपट्टी ही स्पिन बॉलिंगला मदत करते, त्यामुळे कुलदीप यादवला संधी मिळाली आहे. तर दुसरीकडे अभिषेक शर्मा हा नामिबियाविरुद्धच्या सामन्याआधी अभिषेक शर्मा आजारी पडल्यामुळे खेळू शकला नव्हता.
भारताची प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
