या सामन्यात टीम इंडियाच्या फिल्डिंगनेही निराशा केली. पॉवर प्ले मध्येच अभिषेक शर्माने रोस्टन चेसचा सोपा कॅच सोडला. यानंतर 19 व्या ओव्हरमध्ये अभिषेकने पुन्हा एकदा रोव्हमन पॉवेलचे कॅच सोडला. तर वरुण चक्रवर्तीने रन आऊटची संधी असतानाही गोंधळ घातला, त्यामुळे चेसला आणखी एक जीवनदान मिळालं. यानंतर 13 व्या ओव्हरमध्ये तिलक वर्माने शरफेन रदरफोर्डचा कॅच पकडताना चूक केली. तिलक वर्मा हा बाऊंड्री लाईनच्या पुढे उभा होता आणि त्याच्या हातावरून बॉल गेला. तिलक बाऊंड्री लाईनवर उभा असता तर त्याला हा कॅच सहज पकडता आला असता.
advertisement
अर्शदीपच्या एका ओव्हरला आल्या 24 रन
इनिंगच्या 16 व्या ओव्हरमध्ये अर्शदीप सिंगने तब्बल 24 रन दिल्या. रोव्हमन पॉवेलने अर्शदीपच्या ओव्हरमध्ये दोन सिक्स आणि एक फोर मारल्या, तसंच अर्शदीपने वाईड आणि 4 रन अशा एकूण 5 रनही दिल्या. या ओव्हरनंतर वेस्ट इंडिजला पुन्हा एकदा मोमेन्टम मिळालं. वरुण चक्रवर्तीच्या पुढच्याच ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजने 14 रन दिल्या.
टीम इंडियासाठी करो या मरो
टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलला पोहोचायचं असेल, तर टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवावाच लागणार आहे. या सामन्यात पराभव झाला तर टीम इंडियाचं टी-20 वर्ल्ड कपमधलं आव्हान संपुष्टात येईल. तर दुसरीकडे वेस्ट इंडिजचा विजय झाला तर ते सेमी फायनलमध्ये पोहोचतील.
भारताची प्लेइंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
