TRENDING:

Asia Cup 2025 : संजू सॅमसन आऊट, शुभमन गिल इन! UAE विरुद्ध कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

Last Updated:

INDIA vs UAE, Asia Cup 2025 : शुभमन गिल आणि संजू सॅमसन या दोघांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये कसे बसवायचे हा सर्वात मोठा सुर्यकुमार यादव आणि गौतम गंभीर यांच्यासमोर प्रश्न आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Team India Playing XI vs UAE : भारतीय संघ बुधवारपासून आशिया कपमध्ये दुबईमध्ये यूएईविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करेल, परंतु प्लेइंग इलेव्हनबद्दल संघ व्यवस्थापन अजूनही गोंधळलेला आहे. कसोटी कर्णधार गिल उपकर्णधार म्हणून टी-ट्वेंटी संघात परतला आहे, तर विकेटकीपर संजूने अलिकडच्या काळात सलामीवीर म्हणून चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे शुभमन गिल आणि संजू सॅमसन या दोघांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये कसे बसवायचे हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
Team India Playing XI vs UAE
Team India Playing XI vs UAE
advertisement

ओपनिंगला कोण? 

आशिया कपमध्ये भारतीय संघाच्या पहिल्या सामन्यात रिंकू सिंग आणि संजू सॅमसन सारख्या मोठ्या मॅचविनर्सना जागा नसल्याचं जवळपास फिक्स होताना दिसतंय. गेल्या काही वर्षांत तिलक वर्माने तिसऱ्या क्रमांकावर आपले स्थान पक्कं केलं आहे. आयपीएल 2025 मध्ये त्याची कामगिरी फारशी चांगली नसली तरी, त्याने या स्थानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दोन शतके झळकावली आहेत. त्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.

advertisement

चौथ्या क्रमांकावर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव हा या संघाचा बॅकबोन असेल. तो संघाचा सर्वोत्तम फलंदाज आहे आणि वरच्या आणि खालच्या फळीतील दुवा म्हणून काम करून संघाला खूप मदत करेल. तर अक्षर पटेलला भारताचा पाचवा क्रमांकाचा फलंदाज म्हणून उतरवलं जाऊ शकतं. पांड्याच्या आधी त्याला संधी दिली जाऊ शकते. तर ऑलराऊंडर खेळाडू म्हणून हार्दिक पांड्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.

advertisement

'महेंद्रसिंग धोनीमुळे मला सरड्यासारखं....', 21 वर्षांची मनातली सल अखेर ओठांवर, दिनेश कार्तिक म्हणाला...

जितेश शर्माने भारतासाठी फक्त 9 टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, परंतु जर गिलच्या जागी सॅमसनला संघात समाविष्ट केलं नाही तर तो विकेटकीपर म्हणून त्याला पहिली पसंती असेल. तसेच कुलदीप यादव हा भारताचा प्रमुख फिरकी गोलंदाज आशिया कपसाठी एक्स-फॅक्टर आहे. आयपीएलनंतर तो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही, तो काही सामना जिंकणारी कामगिरी करण्यास उत्सुक असेल.

advertisement

अर्शदीप सिंग हा भारताचा आतापर्यंतचा टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. डावखुरा वेगवान गोलंदाजाने पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये वर्चस्व गाजवलं होतं. तर बुमराह आणि अर्शदीप यांची जोडी पॉवरप्ले कमाल दाखवू शकते. गेल्या काही वर्षांत आयपीएलमध्ये सर्वात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या वरुण चक्रवर्तीचा सामना करणं कोणालाही सोपं जाणार नाही.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup 2025 : संजू सॅमसन आऊट, शुभमन गिल इन! UAE विरुद्ध कशी असेल टीम इंडियाची Playing XI?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल