ठाण्यातील वडपे परिसरामध्ये ही वाहतूक कोंडी झाली असून मुंबईकडे, नाशिक- कल्याणकडे आणि आत ठाण्यामध्ये जाणारे सर्वच रस्ते गेल्या काही वेळेपासून ठप्प झाले आहेत. 10 किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे वाहतूक दारांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. नेमकं वाहतूक कोंडीचं कारण अद्याप अस्पष्ट असून वाहने पुढे सुद्धा आणि मागे सुद्धा जात नाही. त्यामुळे सर्वांचीच ऐन संध्याकाळच्या वेळी तारांबळ उडाली आहे.
advertisement
मुंबई-नाशिक महामार्गावरील ठाणे ते वडापे दरम्यानच्या रस्ता रूंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. त्याचे सध्या काम सुरू आहे. माजिवाडा आणि वडापे दरम्यानच्या 28.80 किमी लांबीच्या रस्त्याचे मोठ्या प्रमाणावर पूर्ण झालेले आहे. कंत्राटदाराकडून कामाला गती मिळाली असून प्रकल्पाचे काम येत्या काही दिवसांमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. रस्त्याच्या कामामुळे वाहतूकदारांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. जून 2021 मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाचा उद्देश महामार्गाचा चार लेनवरून आठ लेनपर्यंत विस्तार करणे आणि या मार्गावरील तीव्र वाहतूक कोंडीची समस्या सोडवणे हा आहे.
