कोकणवासीयांसाठी एसटीचे 'होळी गिफ्ट'
कोकणात शिमगोत्सवाला खुप महत्त्व आहे. ज्यामध्ये देवाच्या पालख्या, ग्रामदैवतांची पूजा आणि पारंपरिक कार्यक्रमांसाठी मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरातील कोकणवासीय मोठ्या संख्येने गावी जातात. ही गर्दी लक्षात घेऊन एसटीने दरवर्षीप्रमाणे यंदाही विशेष बसेसची सोय केली आहे.
पालघर विभागातील वसई, अर्नाळा आणि नालासोपारा या तीन आगारांतून आतापर्यंत 32 बस आरक्षित झाल्या आहेत. ज्यात 28 फेब्रुवारी रोजी सर्वाधिक गर्दी अपेक्षित आहे. त्या दिवशी वसई आणि अर्नाळा येथून प्रत्येकी 2 तर नालासोपाऱ्यातून 23 अशा एकूण 27 बस कोकणात जाणार आहेत शिवाय 1 मार्च रोजी वसई आणि नालासोपारा येथून प्रत्येकी 2 बस सुटणार आहेत तसेच 5 मार्च रोजी नालासोपाऱ्यातून आणखी एक बस आरक्षित करण्यात आली आहे.
advertisement
परतीच्या बसेससाठीही आरक्षण सुरू
फक्त जाण्यासाठीच नव्हे तर होळी संपल्यानंतर परतीच्या प्रवासासाठीही आगाऊ नोंदणी सुरू आहे. आतापर्यंत 6 बस आरक्षित झाल्या आहेत. 3 आणि 4 मार्च रोजी नालासोपाऱ्यातून प्रत्येकी एक बस सुटेल. 5 मार्च रोजी नालासोपारा आणि अर्नाळा येथून प्रत्येकी एक बस परतीसाठी धावणार आहे.
