नेमका पुल कुठे बांधण्यात येणार?
मिळालेल्या माहितीनुसार ठाणे बेलापूर महामार्गावरील रबाळे, पावणे तसेच तुर्भे येथे हे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. शिवाय पाम बीच मार्गाच्या शेवटच्या भागी दुहेरी भुयारी मार्ग उभारला जाणार आहे. यात सिग्नलमुक्त वाहतूकीसाठी किल्ले जंक्शन येथे भुयारी मार्गाचा ठराव मंजूर केला आहे.
वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होण्याचे मुख्य कारण ही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू आणि ऐरोलीच्या खाडी जोड पुलामुळे हे प्रमाण वाढलेले आहे. या सर्व मार्गांवर गेल्या काही दिवसांत नवी मुंबईत येणाऱ्या वाहनांची संख्या वाढलेली आहे. शिवाय पुनर्विकास प्रकल्पामुळे वाहतुकीवरचा ताणही वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
advertisement
भुयारी मार्ग आणि तीन उड्डाणपुलांच्या प्रकल्पांची अंबलमबजावणी ही अॅन्युटी मॉडेल पद्धतीने केली जाणा असून या प्रकल्पासाठी लागणारा 30 टक्के रकमेचा खर्च ठेकेदाराला जाणार आहे. तर राहिलेली 70 टक्के खर्च हा पूर्ण झाल्यानंतर दिला जाणार आहे. संपूर्ण प्रकल्पाचे काम झाल्यानंतर 10 वर्षात ती रक्क दिली जाईल असे सांगितले आहे.
