डायनासोर कालांतराने नष्ट झाले पण साप मात्र अजूनही पृथ्वीवर आहेत, पण यात असा प्रश्न उपस्थीत होतो की समजा साप या जगातून नाहीसे झाले, तर काय होईल?
पृथ्वीवर साप नसतील तर पर्यावरणावर काय परिणाम होईल हे आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत. पण त्याआधी तुम्हाला सापांच्या पायाची कहाणी जाणून घेणे आवश्यक आहे.
advertisement
वास्तविक, सापाच्या या जीवाश्मामध्ये ज्या प्रकारचे पाय दिसले ते खूपच लहान आणि नाजूक होते. काही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की त्यावेळी सापांनी पोहण्यासाठी या पायांचा वापर केला असावा. तर, जमिनीवर ते फक्त रांगतच फिरत असत. ही कथा आहे सापाच्या पायांची. आता आपण सांगू या जगातून साप नाहीसे झाले तर काय होईल?
साप हा फक्त माणसांना चावायलाच नसतो .तर पर्यावरणासाठीही त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. सापांचा नायनाट केल्यास उंदीर काही दिवसांतच शेतकऱ्यांची शेतजमिनी नष्ट करतील. याशिवाय सापांना आपले भक्ष्य बनवणारे प्राणीही नामशेष होण्याच्या मार्गावर येतील. सापाच्या विषापासून अनेक प्रकारची औषधे बनवली जातात. या पृथ्वीवरून साप नाहीसे झाले तर त्या औषधांचा तुटवडा निर्माण होईल. याशिवाय जर साप नामशेष झाले तर पृथ्वीवर बेडकांची संख्या इतकी वाढेल की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही.
