advertisement

Stomach Irritation : उन्हाळ्यात पोट का दुखतं ? पोटदुखी कमी करण्यासाठी काय करायचं ?

Last Updated:

उन्हाळ्यात मसालेदार आणि तिखट पदार्थ खाल्ल्यानं पोटात आणि छातीत जळजळ होऊ शकते, तसंच काहींना डोकेदुखीचाही त्रास होतो. छातीत आणि पोटात जळजळ होण्याचं मुख्य कारण केवळ आहार नसून, वाढलेलं आम्ल आणि पित्ताचे विकार हे देखील आहे.

News18
News18
मुंबई : उन्हाळा सुरू झाला की काहींना त्वचेचे विकार होतात तर काहींना पोटदुखीचे. पोटाचे विकार आपल्याला त्रास देऊ शकतात.
उन्हाळ्यात काहींना भूक लागत नाही केवळ थंड पेयं आणि पदार्थ खावेसे वाटतात. उन्हाळ्यात मसालेदार आणि तिखट पदार्थ खाल्ल्यानं पोटात आणि छातीत जळजळ होऊ शकते, तसंच काहींना डोकेदुखीचाही त्रास होतो. छातीत आणि पोटात जळजळ होण्याचं मुख्य कारण केवळ आहार नसून, वाढलेलं आम्ल आणि पित्ताचे विकार हे देखील आहे.
आयुर्वेदानुसार, उन्हाळ्यातली पोटदुखी हे शरीरातील पित्त आणि आम्ल वाढल्याचं लक्षण असू शकतं. पित्त जास्त होतं, तेव्हा छातीत जळजळ होणं, आंबट ढेकरा येणं, डोकं जड वाटणं किंवा डोळ्यांची जळजळ होणं यांसारखी विविध लक्षणं दिसू शकतात.
advertisement
रात्री उशीरा जेवणं, मसालेदार आणि तळलेले पदार्थ खाणं, अति चहा आणि कॉफी, अतिरिक्त ताण आणि दीर्घकाळ उपाशी राहणं यामुळे देखील पोटातील आम्ल वाढू शकतं.
आयुर्वेदात यासाठी काही शीत आणि पित्तशामक पदार्थांचे उपाय सांगितलेत. शतावरी, शंखाची राख आणि ज्येष्ठमध यांचा संतुलित वापर केल्यामुळे शरीरातील अग्नी शांत होण्यास आणि पित्त संतुलित होण्यास मदत होते, असा विश्वास आहे. पण हा उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
advertisement
advertisement
याव्यतिरिक्त, ज्येष्ठमध आणि खडी साखर खाल्ल्यानं पोटातील जळजळ शांत होण्यास मदत होते. या दोन्हींचं मिश्रण कोमट दुधात किंवा पाण्यात मिसळून घ्या. यामुळे पोटातील उष्णता कमी होते आणि छाती आणि घशातील जळजळ कमी होते.
पोटातील आम्लपित्ताचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि पित्त संतुलित ठेवण्यासाठी सूर्यास्तापूर्वी रात्रीचं जेवण करा. जेवणानंतर लगेच बसण्याऐवजी, थोडा फेरफटका मारा. यामुळे अन्न पचायला मदत होईल आणि गॅस आणि ढेकरांचं प्रमाण कमी होईल. उन्हाळ्यात, लापशी आणि पेज यांसारखे पोटाला थंडावा देणारे हलके पदार्थ खा.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Stomach Irritation : उन्हाळ्यात पोट का दुखतं ? पोटदुखी कमी करण्यासाठी काय करायचं ?
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement