19 भाषा, 10 हजार गाणी, 3 राष्ट्रीय पुरस्कार! एकेकाळी लता दीदींच्या स्टारडमला दिलेला धक्का, सुप्रसिद्ध गायिकेचा राहत्या घरी झालेला दुर्दैवी अंत
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
अशा एका दिग्गज गायिका होत्या, ज्यांनी आपल्या आवाजाची जादू १० हजार गाण्यांमधून दाखवून दिली, पण तरीही त्यांचं आयुष्य एक रहस्य बनून राहिलं.
advertisement
advertisement
३० नोव्हेंबर १९४५ रोजी तामिळनाडूतील वेल्लोर येथे जन्मलेल्या वाणी यांचे बालपण सुरांच्या सानिध्यातच गेले. घरची परिस्थिती बेताची असली तरी संगीताची ओढ मोठी होती. मद्रास विद्यापीठातून पदवी पूर्ण केल्यावर त्यांनी चक्क चेन्नई आणि हैदराबादच्या भारतीय स्टेट बँकेत नोकरी केली. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं.
advertisement
१९६९ मध्ये त्यांची भेट संगीतकार वसंत देसाई यांच्याशी झाली. वसंत देसाई त्यावेळी दिग्गज गायक कुमार गंधर्व यांच्यासोबत एका मराठी अल्बमवर काम करत होते. वाणी यांचा आवाज ऐकताच देसाईंनी त्यांना कुमारजींसोबत "ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी..." हे गाणं गाण्याची संधी दिली. हे गाणं आजही प्रत्येक मराठी घराघरात ऐकू येतं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement







