Women Health : तिशीनंतर महिलांसाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग का असतं गरजेचं? 'या' सोप्या पद्धतीनं करू शकता सुरूवात..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Strength Training Importance : अनेक अभिनेत्री आणि फिटनेस कोच यांचं मत आहे की, महिलांनी तिशीनंतर स्ट्रेंथ ट्रेनिंग करायला हवं. कारण यामुळे त्यांचे शरीर आणि एकूणच आरोग्य दीर्घकाळ चांगलं राहातं. स्ट्रेंथ ट्रेनिंगचे फायदे आणि सुरुवात कशी करायची पाहूया.
advertisement
advertisement
advertisement
तिशीनंतर बहुतेक महिलांना वजन कमी करण्यासाठी खूप पर्यंत करावे आणि तरीही कित्त्येकदा यश येत नाही. हे पचनक्रिया मंदावल्यामुळे होते. अशावेळीही स्ट्रेंथ ट्रेनिंग आवश्यक असते. कारण स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्याने मसल्स वाढतात आणि मसल्स चरबीपेक्षा जास्त कॅलरीज जाळतात. याचा अर्थ तुमच्या शरीरात जितके जास्त लीन मसल्स असतील, तितक्या जास्त कॅलरीज तुमचे शरीर जाळते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
advertisement
advertisement
advertisement
हल्ली बहुतांश लोकांचे काम एकाजागी बसून असते किंवा ज्यांचे काम बसून असते, त्या लोकांनी तर स्ट्रेंथ ट्रेनिंग करायलाच हवी. कारण तुमच्या दुखत असलेल्या पाठ आणि मानेला आराम मिळू शकतो. स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्याने तुमचे मुख्य स्नायू म्हणजेच कोर मसल्स मजबूत होतात. तुमचे पोश्चर सुधारते आणि जुनाट वेदनाही कमी होतात.
advertisement
स्ट्रेंथ ट्रेनिंगला सुरवात कधी करावी हा बऱ्याच लोकांच प्रश असतो. त्यासाठी इथे काही टिप्स दिलेल्या आहेत. स्ट्रेंथ ट्रेनिंग करताना पहिल्याच दिवशी जड डबल्स उचलू नका. त्याऐवजी आधी बॉडीवेट व्यायाम करा. जसे की पुश-अप्स, स्क्वॅट्स आणि प्लँक्स. त्यानंतर काहुळाळू रेझिस्टन्स बँड्सकडे जा. हे तुमच्या सांध्यांसाठी सोपे असतात आणि मसल्स टोन करतात.
advertisement
शरीराला थोडी सवय लागल्यानंतर हलके वजन उचलायला सुरुवात करा. सुरुवातील 1-2 किलोचे डबल्स उचला. तुम्ही आठवड्यातून किमान 2 ते 3 दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग करायची सवय लावा. सुरुवातीला एवढा कालावधी पुरेसा आहे. व्यायामानंतर शरीराला रिकव्हर होण्यासाठीही वेळ द्या. हे जास्त गरजेचं आहे. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)










