अरे बापरे! घामाच्या धारा अन् अंगाची लाहीलाही, एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात उष्णतेची लाट?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
कितीही गार पाणी अंगावर ओता समाधान नाही होणार, इतकी उष्णता अचानक का वाढणार? एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात वातावरणात अचानक बदल होणार, काय आहे कारण?
advertisement
महाराष्ट्रात एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात मात्र मोठ्या प्रमाणात उष्णता वाढणार आहे. पारा 40 अंशांच्या वर जाण्याची शक्यता आहे असं हवामान विभागाने सांगितलं आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात 40 ते 42 डिग्रीपेक्षा जास्त तापमान जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांनी काळजी घ्यावी, 12 ते 4 घराबाहेर कामाशिवाय पडू नये असं आवाहन केलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात उन्हाचे चटके जाणवतील मात्र अधून मधून पाऊसही राहील त्यामुळे दुपारी घामाच्या धारा आणि संध्याकाळी पाऊस असं दुहेरी संकट ओढवण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या अंदाजाबाबत देखील लवकरच IMD कडून महत्त्वाची माहिती दिली जाणार आहे. यंदा मान्सून कमी होईल असा अंदाज वर्तवला आहे.






