Weather Alert: 48 तास धोक्याचे! महाराष्ट्रात पुन्हा वादळी संकट, 16 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. आज पुन्हा 16 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्राला अवकाळी संकटाने हैराण केल्याचं चित्र आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) च्या ताज्या अंदाजानुसार, 4 एप्रिलला महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 30-50 किमी वेगाने वादळी वारे येण्याची शक्यता आहे. काही भागांत गारपिटीचा (Hailstorm) इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांना यलो अलर्ट असेल.
advertisement
advertisement
मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं धुमशान सुरू आहे. पुण्यासह, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस होतोय. आज देखील या भागात वादळी पावसाचा अंदाज आहे. मात्र कोणत्याही जिल्ह्याला महत्त्वाचा अलर्ट नाही. 24 तासानंतर हवामानात मोठ्या बदलांची शक्यता असून उष्णता वाढेल आणि पावसाचा जोर ओसरेल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
दरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आज अवकाळी पावसाची शक्यता असून 16 जिल्ह्यांना यलो अलर्ट असेल. बहुतेक भागांत कमाल तापमान 35-40 अंशांपर्यंत गेलं आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर कमी होऊन उष्णतेची तीव्रता वाढेल. किनारी भागात दमट हवामानामुळे हैराण करणारी स्थिती असेल. विशेषत: शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याची गरज आहे.








