Weather Alert : राज्यात पुढील 24 तास पावसाचे, 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
पुढील 24 तासांसाठी देखील राज्यातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि साताऱ्याचा घाट परिसर आणि सातारा जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
advertisement
पुढील 24 तासांसाठी देखील राज्यातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि साताऱ्याचा घाट परिसर आणि सातारा जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील 24 तास राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे असणार आहेत. पाहुयात 27 मे रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
advertisement
advertisement
तर पुणे जिल्ह्याचा उर्वरित भाग, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. नाशिक आणि नाशिकचा घाट परिसर यामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर जळगाव, धुळे आणि नंदुरबार मध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यातही संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता.
advertisement
advertisement
तर विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई आणि आसपासचे जिल्हे, तळ कोकणातील जिल्हे तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.