T20 World Cup : वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात टॉस हरला, भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणते बदल? 5 पॉईंट्समध्ये समजून घ्या
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या मोहिमेला सुरूवात झाली आहे. वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना युएसएविरुद्ध होत आहे.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि युएसए यांच्यात टी-20 वर्ल्ड कपचा सामना होत आहे. या सामन्यात अमेरिकेने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. बुमराहला बरं नसल्यामुळे तो पहिल्या सामन्यात खेळत नाहीये. याशिवाय संजू, सुंदर आणि कुलदीपलाही संधी मिळालेली नाही.
advertisement
advertisement
advertisement
advertisement







